दत्तनगरच्या समस्यांचे तात्काळ निवारण करा;अन्यथा उग्र आंदोलन करू;भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष मगर यांचा इशारा

श्रीरामपूर
दत्तनगर भागातील लोकांना नागरी सुविधा उपलब्ध करा अन्यथा आठ दिवसांमध्ये आपल्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचा आंदोलन करू या मागणीचे निवेदन ग्रामसेवक रुबाब पटेल यांना भीमशक्ती जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांनी दिले आहे.
यावेळी मगर म्हणाले की दत्तनगर गावातील प्रत्येक भागात रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे. मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत आणि सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे पावसाचे पाणी खड्ड्यामध्ये पडल्याने लोकांना खड्डे दिसत नाही आणि खड्डे चुकवण्याच्या नादात अपघात होत आहे. तसेच खड्ड्यामुळे लहान मुलांना शाळेत जाण्यास सुद्धा खूप त्रास होत आहे. अनेक वेळा खड्डे बुजवण्याची मागणी केली असता ती मागणीकडे दुर्लक्ष केले आहे लाईटची खूप मोठी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे प्रत्येक भागात लाईट बंद आहे लोकांना अंधारातून जावा लागत आहे सगळीकडे कचरा साचल्याने लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे साफसफाई सुद्धा होत नाही अनेक भागात गटारी तुंबल्याने डास खूप वाढलेले आहेत. लोकांच्या आरोग्याचा प्रश्नही खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला आहे. स्मशानभूमीत शवदायिनी मागणी अनेक दिवसापासून केली असता ति पूर्ण न झाल्यामुळे  तिथे अक्षरशा अंत्यविधी खाली करावा लागत आहे. तसेच सध्या घरकुलाची यादी चालू आहे परंतु काही लाभार्थीकडे अपुरे कागदपत्र असल्यामुळे त्यांची आपण नोंदणी केलेली नाही. त्यामुळे आपण सर्वांना लाभ कसा देता येईल यासाठी आपण पुन्हा लाभार्थ्याची नोंदणी करावी असे अनेक प्रकारच्या मागणीचे निवेदन त्यांना देण्यात आले. जर येत्या आठ दिवसांमध्ये लोकांच्या मागणीचा विचार न केल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर मागण्या पूर्ण करण्यासाठी तीव्र स्वरूपाचा आंदोलन करू असा इशारा शेवटी देण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे, सुरेश शिवलकर, विश्वास भोसले, संतोष केदारे, अश्रू बादमे,अनिल माघाडे ,तन्वीर शेख यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

दत्तनगरच्या विविध समस्यांबाबत ग्रामसेवक यांना भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांनी निवेदन दिले.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News