बीएसएनएल कंपनी नजीकच्या काळात पहिल्या क्रमांकावर दिसेल-बोरावके;श्रीरामपूर येथे रंगला सन्मान सोहळा

श्रीरामपूर-
भारतीय दूरसंचार निगमच्या कारभाराबद्दल दूरध्वनीधारकांच्या असलेल्या तक्रारी व गैरसमज दूर करून उत्तम सेवा देणारी कंपनी म्हणून ती पहिल्या क्रमांकावर नेण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येईल, असे प्रतिपादन टेलिफोन निगमचे नूतन संचालक ऍड. रवींद्र बोरावके यांनी केले. श्रीरामपूर येथे माळी बोर्डींग, समता प्रतिष्ठान व अखिल भारतीय महात्मा फुले, समता परिषद आदींच्या संयुक्तीक विद्यमाने भारत संचार निगमच्या संचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल ऍड. रवींद्र बोरावके व आरोग्य मित्र, नागेबाबा परिवाराचे सदस्य सुभाषराव गायकवाड यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ऍड. बोरावके बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे संचालक माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे होते.
याप्रसंगी आ. हेमंत ओगले, कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, श्री इम्पेक्सचे संचालक विजय कुदळे, कोपरगाव माळी बोर्डींगचे अध्यक्ष बाळासाहेब पांढरे, श्रीरामपूर माळी बोर्डींग अध्यक्ष दीपक गिरमे, विश्‍वस्त सुरेंद्रनाना गिरमे व पदाधिकारी, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश कुर्‍हे, तालुकाध्यक्ष चंद्रकांत झुरंगे, विवेक गिरमे, प्राचार्य टी. ई. शेळके, प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये, शंकर गागरे, शिवाजीराव बारगळ, शशांक रासकर, जालिंदर कुर्‍हे, सुनील सोनवणे, बाळासाहेब हरदास, राजेंद्र सातभाई, दादासाहेब मेहेत्रे, सुभाष वाघुंडे, सचिन गिरमे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आ. हेमंत ओगले, करण ससाणे व सचिन गुजर आदींनी मनोगतातून ऍड. बोरावके यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक चंद्रकांत झुरंगे यांनी केले. सूत्रसंचालन प्रसन्न धुमाळ यांनी केले. तसेच विलास घोगरे, एकनाथ दुधाळ, जेष्ठ नागरीकचे लक्ष्मण निकम, एस. के. कुर्‍हे, विलास कुदळे, राऊत, सर होले, अशोक ससाणे, लक्ष्मण आगरकर, अशोक सोनवणे, किशोर ससाणे, प्रभाकर भोंगळे, ज्ञानेश्‍वर पवार, डॉ. लोंढे आदींसह श्रीरामपूर, राहुरी तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते.

ऍड.रवींद्र बोरावके व सुभाषराव गायकवाड यांचा आ. हेमंत ओगले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भगवंताचे नामस्मरण हीच खरी  संपत्ती-मंहत रामगिरी महाराज;शनी देवगाव येथे गोदातीरी अवतरली प्रतिपंढरी

श्रीरामपूर-हरिनाम व रामनाम घेतल्याने पाप नष्ट होते.मनुष्याला व्यसन लागल्यावर ते सुटत नाही परंतु संताच्या सान्निध्यात आल्यामुळे त्याच्या जिवनात बदल होतो.भगवंताचे नामस्मरण हीच खरी संपत्ती आहे.विस पंचवीस वर्षापूर्वी काही  थोरामोठ्यांचे,संताचे चरित्र पाठ्यपुस्ताकात

कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार-जलसंपदा मंत्री विखे पाटील;नदीजोड प्रकल्पाच्या पहिल्या कार्यालयाचे लोकार्पण

श्रीरामपूर- ‘नदीजोड’च्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार असून पर्जन्यछाया असलेल्या भागांमध्ये जलसिंचनाची मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.नाशिक

साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचे सोने-मंहत रामगिरी महाराज;शनि देवगाव सप्ताहात गोदावरी नदीतीरी लाखो भाविकांची मांदियाळी

श्रीरामपूर-मानवाच्या मन व बुद्धी यांचे शुद्धीकरण करण्यासाठीच आपल्या साधुसंतांनी अखंड हरिनाम सप्ताह सारख्या परंपरा सुरू केल्या.ज्याप्रमाणे परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते,त्याचप्रमाणे साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचेही सोने होते,असे प्रतिपादन महंत रामगिरीजी

लोणी खुर्द येथे घरकुलासाठी ४७ गुंठे जागेचा प्रस्ताव शासनाकडे- मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील; ८ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात

श्रीरामपूर-लोणी खुर्द येथील भीमनगर वसाहतीमधील रहिवाशांना त्यांच्या हक्काचे घरकुल मिळावे, यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शासनाच्या मालकीची ४७ गुंठे जागा निश्चित करून तिचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

Latest News

Trending News