“विठुरायाच पावला”;आषाढ सरींमुळे खरीप पिकांना जीवदान;श्रीरामपूर तालुक्यात सोयाबीन,कपाशी,मका तरारली

श्रीरामपूर-नितीन शेळकेमे महिन्यात अवकाळी पाऊस मनसोक्त बरसून गेल्यानंतर खरीप हंगामातील पेरण्यांसाठी ज्या मान्सूनच्या पावसाची शेतकरी आतुरतेने वाट पाहत होता तो पाऊस...

श्रीरामपूर-नितीन शेळके
मे महिन्यात अवकाळी पाऊस मनसोक्त बरसून गेल्यानंतर खरीप हंगामातील पेरण्यांसाठी ज्या मान्सूनच्या पावसाची शेतकरी आतुरतेने वाट पाहत होता तो पाऊस अगदी वेळेच्या अगोदर दाखल झालाही होता.जिल्ह्यासह श्रीरामपूर तालुक्यात जुनच्या पहिल्या आठवड्यातच सुमारे 65 टक्के पेरण्या उरकल्या.त्यानंतर मात्र पावसाने उघडीप दिली.सुमारे 20 ते 25 दिवस पावसाचा मोठा खंड तालुक्यात पडला.पेरणी झालेले सोयाबीन, मका आणि कपाशी माना टाकू लागली.भंडारदरा, निळवंडे व नाशिक च्या धरण क्षेत्रात थोडा फार पाऊस सुरू होता.त्यामुळे प्रवरा व गोदावरी नद्या वेळेच्या आतच वाहत्या झाल्या.तरीही शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती ती दमदार पावसाची.अखेर आषाढी एकादशी पासून आषाढ सरी बरसणे सुरू झाले.त्यात म्हणावा असा जोर जरी नसला तरी शेतशिवारातली खरीपाची पेरण्या झालेली पिके तरारून उठली.पिकांना जीवनदान मिळाल्याने बळीराजाही ‘विठुरायाच पावला’ असे म्हणत काहीसा चिंतामुक्त झाला.रिमझिम पावसामुळे खरीप पिकांना नवसंजीवनी मिळाली असली तरी शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची अपेक्षा आहे.कारण अद्यापही बहुतांशी विहिरी व बोअरवेल कोरडेठाक आहेत.तालुक्यातील बेलापूर, मातापूर, अशोकनगर, खंडाळा, निपाणी वडगाव, खोकर, भोकर,कमलपूर, भामठाण, माळवडगाव,खानापूर,टाकळीभान सह सर्वच गावांमध्ये रिमझिम स्वरूपात पाऊस गेली दोन दिवस सुरूच आहे. सध्या भंडारदरा-निळवंडे धरणातून आवर्तन सुरू करण्यात आलेले असल्याने त्याचाही फायदा तालुक्यातील पाटाखालील सिंचन क्षेत्राला होणार आहे. याव्यतिरिक्त गोदावरी आणि प्रवरा नदीकाठच्या शेतकऱ्यांना नदीत पाणी असल्याने त्यांचीही चिंता काही प्रमाणात मिटली आहे.जायकवाडी धरण सुमारे 55 टक्क्यांपर्यंत भरले आहे. तसेच पावसाळ्याचे अजून दोन अडीच महिने शिल्लक असल्याने श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना जायकवाडीला पाणी सोडावे लागण्याची चिंता असणार नाही,असे सध्यचे चित्र आहे.खरीप हंगामातील पिके सध्या जगली असली तरी खतांचे व कीटकनाशकांचे वाढलेले दर युरियाची अनुपलब्धता,लिंकिंग करून खते घेण्याची सक्ती अशा इतर प्रश्नांना शेतकऱ्यांना सध्याच्या घडीला तोंड द्यावे लागत आहे.जिल्ह्यात सर्वत्रच युरियाचा तुटवडा असल्याने शेतकरी बेजार झाला आहे.तसेच या वर्षी पासून सरकारने 1 रुपयात सुरू असलेली पीक विमा योजना बंद करून शेतकऱ्यांचा रोष ओढवून घेतला आहे.नव्याने सुरू करण्यात आलेल्या पीकविमा योजनेला शेतकऱ्यांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नसल्याचे चित्र आहे.31 जुलै ही या योजनेत सहभाग नोंदवण्याची अंतिम मुदत आहे.त्यामुळे अनेक सीएससी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी कमी दिसून येत आहे.

चौकट-
१) ‘ओस पडलेली कृषी केंद्र गजबजली…’
पाऊसच गायब झाल्याने तालुक्यातील कृषी केंद्र अगदी ओस पडली होती. खतांची खरेदी नाही की कीटकनाशकांना मागणी नाही,अशीच काहीशी अवस्था गेले काही दिवस दिसून येत होती.शेतकऱ्यांचा पीक व्यवस्थापनातला उत्साह हरपला होता.परंतु आता पुन्हा पावसाला सुरवात झाल्याने आपसूकच शेतकरी पुन्हा कृषी केंद्रावर दिसू लागले आहेत.

२) ‘हवामानतज्ञांच्या नावानेही सुरू होता शिमगा’
20-25 दिवस मान्सूनच्या पावसात खंड पडला.त्यामुळे नेहमी नित्यनेमाने हवामानाचे अंदाज व्यक्त करणारेही अचानकपणे ‘गायब’ झाले. जून महिन्यात सर्वत्र धो-धो पाऊस पडणार म्हणणानाऱ्या अनेक हवामान तज्ञांच्या नावाने या काळात बोटे मोडली गेली.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!