खाजगी क्लासेसकडून विद्यार्थी व पालकांची आर्थिक लूट;कारवाईची रिपाईची मागणी

श्रीरामपूर:
श्रीरामपूर शहरात ९ ते १२वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आर्थिक लूट करणाऱ्या क्लासचालक शिक्षकांवर कडक कारवाई करावी, अन्यथा रिपाई च्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा रिपाई चे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. तसे निवेदन प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार वनिता कल्हापुरे यांना रिपाई चे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा संघटक राजू नाना गायकवाड महिला आघाडीच्या रमादेवी धीवर शहराध्यक्ष विजय पवार राष्ट्रीय जनसेना पार्टीचे जिल्हाध्यक्ष तेजस गायकवाड यांच्या हस्ते इतर देण्यात आले.त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अहिल्यानगर जिल्ह्यात तसेच श्रीरामपूर शहरात गेली अनेक वर्षापासून ९ ते १२ वी  पर्यंत विविध विषय तसेच सी ई टी, जी ई ई शिकवण्याचे खाजगी क्लास धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी करून त्या नोंदणीच्या अधारे बऱ्याच शिक्षकांनी आपले क्लास श्रीरामपूर तालुका व शहरामध्ये थाटले आहेत. त्या आधारे विद्यार्थ्यांची आर्थिक लूट चालू आहे. ९ वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून तीन विषय इंग्लिश, मॅथ व सायन्स या विषयाचे 16 हजार रुपये घेतले जातात. तसेच दहावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून तीन विषयाचे ३० हजार रुपये घेतले जातात. अकरावी बारावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून एका विषयाचे २० हजार रुपये तर  चार विषय शिकवले जातात.बायोलॉजी फिजिक्स केमिस्ट्री सायन्स या चार विषयाचे ८० हजार रुपये घेतले जातात. एका तासाला २०० ते २५० विद्यार्थी एका क्लास मध्ये क्लासला येतात ६ ते ११ वाजेपर्यंत चार बॅच होतात. म्हणजे आठशे ते नऊशे विद्यार्थी क्लासमध्ये रोज शिकतात तसेच सी जी ई इ ची फी अडीच लाख रुपये आहे.श्रीरामपूर शहरांमध्ये क्लास ची संख्या जवळजवळ 25 ते 30  संख्या आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून घेणाऱ्या पैशाची उलाढाल ही करोडो रुपयांच्या घरात जाते. म्हणून अशा मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयेची आर्थिक लूट केली जाते. तसेच एवढी मोठी आर्थिक उलाढाल असताना सरकारला हे क्लासेसवाले जीएसटी भरतात का? याचा देखील सखोल तपास केला पाहिजे. तसे पाहायला गेले तर खाजगी क्लास चालवायला सरकारी मान्यता नसताना तरी देखील अशा पद्धतीने विद्यार्थ्यांची आर्थिक लूट करून देखील शासन तसेच लोकप्रतिनिधी या खाजगी क्लास चालकांना चकार शब्द सुद्धा जाब विचारात नाही. म्हणून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट करणाऱ्या क्लास चालकांचे दप्तर तपासून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येऊन विद्यार्थ्यांना परवडेल अशी वाजवी फी घेऊन त्याचा फलक क्लास बाहेर मोठ्या अक्षरात लावण्यात यावे. तसेच मुलांना शिकवणारे शिक्षक प्रशिक्षित आहेत का त्याची देखील चौकशी झाली पाहिजे.अन्यथा रिपाई च्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा रिपाई चे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी दिला आहे.त्यावेळी मनोज काळे, कारभारी त्रिभुवन, संजय बोरगे, उज्वला येवलेकर, बाबासाहेब पवार, विलास जाधव, संघराज त्रिभुवन आदी उपस्थित होते.

क्लासचालक शिक्षकांवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईच्या वतीने प्रांताधिकारी यांना देण्यात आले.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भगवंताचे नामस्मरण हीच खरी  संपत्ती-मंहत रामगिरी महाराज;शनी देवगाव येथे गोदातीरी अवतरली प्रतिपंढरी

श्रीरामपूर-हरिनाम व रामनाम घेतल्याने पाप नष्ट होते.मनुष्याला व्यसन लागल्यावर ते सुटत नाही परंतु संताच्या सान्निध्यात आल्यामुळे त्याच्या जिवनात बदल होतो.भगवंताचे नामस्मरण हीच खरी संपत्ती आहे.विस पंचवीस वर्षापूर्वी काही  थोरामोठ्यांचे,संताचे चरित्र पाठ्यपुस्ताकात

कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार-जलसंपदा मंत्री विखे पाटील;नदीजोड प्रकल्पाच्या पहिल्या कार्यालयाचे लोकार्पण

श्रीरामपूर- ‘नदीजोड’च्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार असून पर्जन्यछाया असलेल्या भागांमध्ये जलसिंचनाची मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.नाशिक

साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचे सोने-मंहत रामगिरी महाराज;शनि देवगाव सप्ताहात गोदावरी नदीतीरी लाखो भाविकांची मांदियाळी

श्रीरामपूर-मानवाच्या मन व बुद्धी यांचे शुद्धीकरण करण्यासाठीच आपल्या साधुसंतांनी अखंड हरिनाम सप्ताह सारख्या परंपरा सुरू केल्या.ज्याप्रमाणे परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते,त्याचप्रमाणे साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचेही सोने होते,असे प्रतिपादन महंत रामगिरीजी

लोणी खुर्द येथे घरकुलासाठी ४७ गुंठे जागेचा प्रस्ताव शासनाकडे- मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील; ८ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात

श्रीरामपूर-लोणी खुर्द येथील भीमनगर वसाहतीमधील रहिवाशांना त्यांच्या हक्काचे घरकुल मिळावे, यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शासनाच्या मालकीची ४७ गुंठे जागा निश्चित करून तिचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

Latest News

Trending News