श्रीरामपूरमध्ये सापडलेल्या १४ कोटींच्या ड्रग्सची चौकशी करा-आ.ओगले;अधिवेशनात पिकविमा,कर्जमाफी, बोगस बियाणे प्रश्नांवर आ.ओगलेंनी सरकारला घेरले

श्रीरामपूर:
श्रीरामपूर एमआयडीसी मध्ये सापडलेल्या १४ कोटींच्या ड्रग्स बाबत सखोल चौकशी करा अशी आग्रही मागणी राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीवर बोलताना श्रीरामपूर- राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत ओगले यांनी केली.आ ओगले यांनी अधिवेशनात अत्यंत आक्रमक भूमिका घेत मतदारसंघातील अनेक महत्त्वपूर्ण विषयांना वाचा फोडली. त्यामध्ये प्रामुख्याने श्रीरामपूर एमआयडीसी मध्ये सापडलेल्या १४ कोटींच्या ड्रग्स बाबत सखोल चौकशीची मागणी त्यानी लावून धरत श्रीरामपूर सारख्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स बरोबर नशेचे इंजेक्शन वाईटनर यांसारख्या अमली पदार्थांची सर्रास विक्री चालू असून मोठ्या प्रमाणावर गांजा देखील तस्करी होत असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. आ. ओगले यावेळी म्हणाले की, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मतदारसंघात पोलीस स्टेशनची संख्या वाढविणे आवश्यक आहे.देवळाली प्रवरा पोलीस स्टेशनसाठी मी पहिल्या दिवसापासून मागणी केलेली आहे त्याबाबत देखील सकारात्मक भूमिका घ्यावी. संपूर्ण मतदारसंघात महावितरणच्या सेवेचे तीन तेरा वाजले असून श्रीरामपूर येथील २०० के. व्हीं चे मंजूर असलेल्या सबस्टेशनचे काम तातडीने चालू करावे.त्यामुळे मतदारसंघातील विजेचा प्रश्न मार्गी लागणार आहे. अनेक शेतकरी बांधवांनी सोलर कृषी पंपांची मागणी करून देखील शेतकऱ्यांना सोलर कृषी पंप मिळत नाहीत.बोगस बियाणांचा प्रश्न अत्यंत गंभीर असून यामुळे बळीराजा अडचणीत येताना दिसत आहे याबाबत सरकार कठोर पावले उचलणार आहे का ? शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केवळ घोषणाच ठरली असून कृषी विभागाने पीक विम्याचा करोडो रुपयांचा हप्ता देखील आजतागायत भरला नसल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यामुळे सरकारने तातडीने पिकविमाचा हप्ता भरावा अशी मागणी आमदार हेमंत ओगले यांनी केली आहे.

राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीवर बोलताना श्रीरामपूर- राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत ओगले.

*चौकट:पिकविम्याची थकीत रक्कम वर्ग करण्याचा निर्णय
पिकविम्याची थकीत रक्कम त्वरित भरण्याबाबत आ. हेमंत ओगले यांनी सभागृहात आवाज उठवताच राज्य सरकारने शासन निर्णय प्रसिद्ध करत सुमारे ३७५ कोटी रुपये वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भगवंताचे नामस्मरण हीच खरी  संपत्ती-मंहत रामगिरी महाराज;शनी देवगाव येथे गोदातीरी अवतरली प्रतिपंढरी

श्रीरामपूर-हरिनाम व रामनाम घेतल्याने पाप नष्ट होते.मनुष्याला व्यसन लागल्यावर ते सुटत नाही परंतु संताच्या सान्निध्यात आल्यामुळे त्याच्या जिवनात बदल होतो.भगवंताचे नामस्मरण हीच खरी संपत्ती आहे.विस पंचवीस वर्षापूर्वी काही  थोरामोठ्यांचे,संताचे चरित्र पाठ्यपुस्ताकात

कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार-जलसंपदा मंत्री विखे पाटील;नदीजोड प्रकल्पाच्या पहिल्या कार्यालयाचे लोकार्पण

श्रीरामपूर- ‘नदीजोड’च्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार असून पर्जन्यछाया असलेल्या भागांमध्ये जलसिंचनाची मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.नाशिक

साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचे सोने-मंहत रामगिरी महाराज;शनि देवगाव सप्ताहात गोदावरी नदीतीरी लाखो भाविकांची मांदियाळी

श्रीरामपूर-मानवाच्या मन व बुद्धी यांचे शुद्धीकरण करण्यासाठीच आपल्या साधुसंतांनी अखंड हरिनाम सप्ताह सारख्या परंपरा सुरू केल्या.ज्याप्रमाणे परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते,त्याचप्रमाणे साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचेही सोने होते,असे प्रतिपादन महंत रामगिरीजी

लोणी खुर्द येथे घरकुलासाठी ४७ गुंठे जागेचा प्रस्ताव शासनाकडे- मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील; ८ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात

श्रीरामपूर-लोणी खुर्द येथील भीमनगर वसाहतीमधील रहिवाशांना त्यांच्या हक्काचे घरकुल मिळावे, यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शासनाच्या मालकीची ४७ गुंठे जागा निश्चित करून तिचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

Latest News

Trending News