भाऊसाहेब कणसे महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या श्रीरामपूर तालुका उपाध्यक्षपदी

श्रीरामपूर-
तालुक्यातील कमलपुर या छोट्याशा गावात शून्यातून विश्व निर्माण करणारे अध्यात्मिक,सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असणारे भाऊसाहेब कणसे यांची महाराष्ट्र नाभिक महामंडळच्या श्रीरामपूर तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाऊसाहेब कणसे यांनी श्रीरामपूर तालुक्यात विश्व हिंदू परिषदचे तालुका कार्यवाह म्हणून देखील काम केलेले आहे
श्रीरामपूर तसेच वैजापूर तालुक्यातुन देखील त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले जात आहे. देवगाव शनी,ता.वैजापूर येथे होणारा 178 व्या योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह यात देखील भाऊसाहेब कणसे यांचे मोलाचे योगदान आहे भाऊसाहेब कणसे यांच्या नियुक्तीमुळे त्यांच्यावर नितांत प्रेम करणारे मित्र आप्तेष्ट नातेवाईक मित्रमंडळी यांच्यामध्ये उत्साहाचे व आनंदी वातावरण आहे.नुकताच कणसे यांचा सप्तक्रोषीच्या वतीने शाल,पुष्पहार  व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येऊन त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

भाऊसाहेब कणसे यांची महाराष्ट्र नाभिक महामंडळच्या श्रीरामपूर तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली

Leave a Comment

संबंधित बातम्या

भगवंताचे नामस्मरण हीच खरी  संपत्ती-मंहत रामगिरी महाराज;शनी देवगाव येथे गोदातीरी अवतरली प्रतिपंढरी

श्रीरामपूर-हरिनाम व रामनाम घेतल्याने पाप नष्ट होते.मनुष्याला व्यसन लागल्यावर ते सुटत नाही परंतु संताच्या सान्निध्यात आल्यामुळे त्याच्या जिवनात बदल होतो.भगवंताचे नामस्मरण हीच खरी संपत्ती आहे.विस पंचवीस वर्षापूर्वी काही  थोरामोठ्यांचे,संताचे चरित्र पाठ्यपुस्ताकात

कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार-जलसंपदा मंत्री विखे पाटील;नदीजोड प्रकल्पाच्या पहिल्या कार्यालयाचे लोकार्पण

श्रीरामपूर- ‘नदीजोड’च्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार असून पर्जन्यछाया असलेल्या भागांमध्ये जलसिंचनाची मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.नाशिक

साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचे सोने-मंहत रामगिरी महाराज;शनि देवगाव सप्ताहात गोदावरी नदीतीरी लाखो भाविकांची मांदियाळी

श्रीरामपूर-मानवाच्या मन व बुद्धी यांचे शुद्धीकरण करण्यासाठीच आपल्या साधुसंतांनी अखंड हरिनाम सप्ताह सारख्या परंपरा सुरू केल्या.ज्याप्रमाणे परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते,त्याचप्रमाणे साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचेही सोने होते,असे प्रतिपादन महंत रामगिरीजी

लोणी खुर्द येथे घरकुलासाठी ४७ गुंठे जागेचा प्रस्ताव शासनाकडे- मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील; ८ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात

श्रीरामपूर-लोणी खुर्द येथील भीमनगर वसाहतीमधील रहिवाशांना त्यांच्या हक्काचे घरकुल मिळावे, यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शासनाच्या मालकीची ४७ गुंठे जागा निश्चित करून तिचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

Latest News

Trending News