शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करायलाच लावू;शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.काळे यांचा एल्गार

श्रीरामपूर-
राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी करीता आपण गुडघे टेकायलाच लावू.निवडणूक जाहीरनाम्यात आश्वासन देऊन शेतकऱ्यांना फसवण्याचे काम सरकार सत्तेत आल्यानंतर करत असले तरी शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अजित काळे यांनी केले.
नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील कारवाडी मध्ये शेतकरी संघटनेच्या शाखेचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे हेही उपस्थित होते.
कारवाडी येथील शेतकरी संघटनेचे शाखा अध्यक्षपदी दिलीप दहे तर उपाध्यक्षपदी परवेज शेख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
ऍड. अजित काळे पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघटनेच्या माध्यमातून आपण लढत राहणार आहे. सत्तेमधील मंत्री अथवा आमदार करीत
असलेल्या बेताल वक्तव्यांचाही त्यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की यापुढे शेतकऱ्यांना बद्दल कोणतेही बेताल वक्तव्य कदापी खपवून घेतले जाणार नाही.
जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी शेतकऱ्यांना वीजेच्या, कर्जाच्या, महसुली अथवा इतर कोणत्याही समस्यांवर खंबीरपणे शेतकरी संघटना उभे राहणार असल्याचे आश्वासन दिले. साखर कारखाने संघटीतपणे लुट करत असल्याच्या विरोधातही येणाऱ्या काळात आपण आवाज उठविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी डॉ. रोहीत कुलकर्णी यांनी तालुक्यात जास्तीत जास्त शाखा उघडण्याचा मनोदय व्यक्त केला. याप्रसंगी यावेळी जिल्हा उपाध्यक्ष हरी अप्पा तुवर ,तालुकाध्यक्ष अशोक काळे ,उपाध्यक्ष बाबासाहेब नागोडे , युवा अध्यक्ष डॉ रोहित कुलकर्णी , जिल्हा संघटक भास्कर तुवर , कायदेशीर सल्लागार एडवोकेट बाळासाहेब कावळे , श्रीरामपूर तालुकाध्यक्ष युवराज जगताप, साहेबराव चोरमल ,एडवोकेट सर्जेराव घोडे,सागर गिरे, प्रकाश जाधव ,शांताराम तुवर , दिलीप पवार , साहेबराव पवार , राजेंद्र कोकणे , बंडू चौगुले ,अजित तुवर , सुनिल शिंगोटे ,गंगारामजी तुवर , कैलास पवार , सुधाभाऊ तुवर , हरिभाऊ जगताप ,बादशाह बेग , समीर शेख , सलीम शेख , मुजफ्फर बेग , आयुबभाई बेग ,  अतुल शिंगोटे , नचिकेत कुलकर्णी , चंद्रकांत हिरवे , गणेश घोगरे , संतोष बोरुडे , गणेश शिंदे , निसार शेख  , हनुमंतराव वाकचौरे , बाळासाहेब शिंगोटे , विशाल पंडीत , गोरख पंडीत , जगन्नाथ तुवर , सुनिल तांबे , योगेश थिटे , दत्तु सावंत , हरिश्चंद्र तांबे , चिलीया तुवर , राधाकृष्ण सुरोसे ,
दगडू शिंगोटे , सइद शेख , योगेश घोगरे , किरण लंघे , सोमनाथ औटी आदी मान्यवरांसह मोठा शेतकरी समुदाय उपस्थित होता .

शेतकरी संघटनेच्या पाचेगाव येथील शाखेचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News