शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करायलाच लावू;शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.काळे यांचा एल्गार

श्रीरामपूर-राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी करीता आपण गुडघे टेकायलाच लावू.निवडणूक जाहीरनाम्यात आश्वासन देऊन शेतकऱ्यांना फसवण्याचे काम सरकार सत्तेत आल्यानंतर करत असले...

श्रीरामपूर-
राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी करीता आपण गुडघे टेकायलाच लावू.निवडणूक जाहीरनाम्यात आश्वासन देऊन शेतकऱ्यांना फसवण्याचे काम सरकार सत्तेत आल्यानंतर करत असले तरी शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अजित काळे यांनी केले.
नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील कारवाडी मध्ये शेतकरी संघटनेच्या शाखेचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे हेही उपस्थित होते.
कारवाडी येथील शेतकरी संघटनेचे शाखा अध्यक्षपदी दिलीप दहे तर उपाध्यक्षपदी परवेज शेख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
ऍड. अजित काळे पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघटनेच्या माध्यमातून आपण लढत राहणार आहे. सत्तेमधील मंत्री अथवा आमदार करीत
असलेल्या बेताल वक्तव्यांचाही त्यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की यापुढे शेतकऱ्यांना बद्दल कोणतेही बेताल वक्तव्य कदापी खपवून घेतले जाणार नाही.
जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी शेतकऱ्यांना वीजेच्या, कर्जाच्या, महसुली अथवा इतर कोणत्याही समस्यांवर खंबीरपणे शेतकरी संघटना उभे राहणार असल्याचे आश्वासन दिले. साखर कारखाने संघटीतपणे लुट करत असल्याच्या विरोधातही येणाऱ्या काळात आपण आवाज उठविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी डॉ. रोहीत कुलकर्णी यांनी तालुक्यात जास्तीत जास्त शाखा उघडण्याचा मनोदय व्यक्त केला. याप्रसंगी यावेळी जिल्हा उपाध्यक्ष हरी अप्पा तुवर ,तालुकाध्यक्ष अशोक काळे ,उपाध्यक्ष बाबासाहेब नागोडे , युवा अध्यक्ष डॉ रोहित कुलकर्णी , जिल्हा संघटक भास्कर तुवर , कायदेशीर सल्लागार एडवोकेट बाळासाहेब कावळे , श्रीरामपूर तालुकाध्यक्ष युवराज जगताप, साहेबराव चोरमल ,एडवोकेट सर्जेराव घोडे,सागर गिरे, प्रकाश जाधव ,शांताराम तुवर , दिलीप पवार , साहेबराव पवार , राजेंद्र कोकणे , बंडू चौगुले ,अजित तुवर , सुनिल शिंगोटे ,गंगारामजी तुवर , कैलास पवार , सुधाभाऊ तुवर , हरिभाऊ जगताप ,बादशाह बेग , समीर शेख , सलीम शेख , मुजफ्फर बेग , आयुबभाई बेग ,  अतुल शिंगोटे , नचिकेत कुलकर्णी , चंद्रकांत हिरवे , गणेश घोगरे , संतोष बोरुडे , गणेश शिंदे , निसार शेख  , हनुमंतराव वाकचौरे , बाळासाहेब शिंगोटे , विशाल पंडीत , गोरख पंडीत , जगन्नाथ तुवर , सुनिल तांबे , योगेश थिटे , दत्तु सावंत , हरिश्चंद्र तांबे , चिलीया तुवर , राधाकृष्ण सुरोसे ,
दगडू शिंगोटे , सइद शेख , योगेश घोगरे , किरण लंघे , सोमनाथ औटी आदी मान्यवरांसह मोठा शेतकरी समुदाय उपस्थित होता .

शेतकरी संघटनेच्या पाचेगाव येथील शाखेचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!