श्रीरामपूर –
तालुक्यातील माळवाडगाव येथे धर्मध्वजाच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित पंचदिवसीय कीर्तन महोत्सवाला भक्तिमय आणि उत्साही वातावरणात सुरुवात झाली. स्वामी अरूणनाथगिरी महाराज यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर कविराज महाराज झावरे (पारनेर) यांच्या प्रभावी कीर्तनाने उपस्थित भाविकांना भक्तिरसात तल्लीन केले.
माळवाडगावचे ग्रामदैवत असलेल्या भवानी देवी मंदिराच्या प्रांगणात ग्रामस्थांनी चार वर्षांपूर्वी ७५ फूट उंचीचा धर्मध्वज उभारला आहे. या धर्मध्वजाच्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी पंचदिवसीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदाही महंत भास्करगिरी महाराज व महंत रामगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने दि. १७ एप्रिल ते २१ एप्रिल दरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार, दि. १७ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, बाजार समितीचे ज्येष्ठ संचालक गिरिधर आसने, युवा नेते निरज मुरकुटे, भाजपा तालुका सरचिटणीस डॉ. शंकरराव मुठे, माजी संचालक बबनराव मुठे, तसेच सारंगधर आसने, नानासाहेब आसने, सुदामराव आसने, पत्रकार विठ्ठलराव आसने, भाऊसाहेब काळे, प्रमोद आसने, दिलीपराव हुरुळे, आसने गुरुजी, यशवंतराव हुरुळे, बाबुराव दळे, भाऊसाहेब आसने, सतीश आसने, सुधीर आसने, अमोल मोरे, रावसाहेब काळे, दादासाहेब अनुसे, उद्धव आसने, दत्तात्रय मोरे, स्नेहल काळे, योगेश लटमाळे, राजेंद्र आसने, पोलीस पाटील मधुकर बनसोडे, नितीन बोरुडे, श्रीराम हुरुळे, परमेश्वर गाढे, बापूसाहेब आसने, योगेश आसने, लखन महाराज, कृष्णा महाराज हापसे, बाळासाहेब महाराज पवार, काशिनाथ महाराज टेकाळे, भालदार चोपदार कैतके बंधू आदी मान्यवर उपस्थित होते.
दीपप्रज्वलनानंतर झालेल्या कीर्तन सोहळ्यात कविराज महाराज झावरे यांनी आपल्या ओजस्वी वाणीतून भक्ती, संस्कार आणि समाजप्रबोधनाचा संदेश दिला. यावेळी सुभाष बाबुराव आसने व विजय दिनकर आसने यांनी महाराजांचे संत पूजन केले तर सह्याद्री मित्र मंडळ व समस्त भजनी मंडळ, माळवाडगाव यांनी भाविकांना भोजन दिले. यावेळी परिसरातील भाविक भक्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजप सोशल मीडिया सेलचे तालुका संयोजक व पत्रकार संदीप आसने यांनी केले.
