श्रीरामपूर-
श्रीरामपूर – राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाने यांनी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे श्रीरामपूर शहराला पाणीपुरवठा करण्याकरिता आवर्तन सोडण्याची मागणी केली होती त्यानुसार सध्या प्रवरा डावा कालव्यामधून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन चालू आहे याच आवर्तनाला जोडून रब्बीचे दुसरे आवर्तन सोडण्याची मागणी आमदार हेमंत ओगले यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जलसंपदा विभागाकडे केली होती.त्यानुसार पिण्याच्या पाण्याचे चालू असलेले आवर्तन हे पुढे सलग चालणार असून शेतीसाठीचे रब्बीचे आवर्तन हे वीस ते पंचवीस दिवस चालणार आहे.
सध्या श्रीरामपूर नगरपरिषदेचे अमृत दोन योजनेचे काम चालू असल्याने शहराला दररोज पाणीपुरवठा होने करिता पिण्याच्या पाण्याचे आवर्तन होणे आवश्यक होते. लाभ क्षेत्रातील धरणांमध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे या अनुषंगाने आमदार ओगले आणि नगराध्यक्ष ससाणे यांनी .आवर्तन सोडण्याची मागणी केली होती.शेतकऱ्यांनी आपले हक्काचे पाणी अबाधित राहण्यासाठी ७ नंबर अर्ज भरून द्यावेत व आपले भरणे करून घ्यावेत याबाबत शेतकऱ्यांना काही अडचण आल्यास त्यांनी मला अथवा नगराध्यक्ष करण ससाने यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील आमदार ओगले यांनी केले आहे.
