मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत कामबंद;भूमि अभिलेख कर्मचाऱ्यांचा इशारा

श्रीरामपूर-भूमि अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या तांत्रिक आणि प्रशासकीय मागण्यांकडे शासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ आता राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार...

श्रीरामपूर-
भूमि अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या तांत्रिक आणि प्रशासकीय मागण्यांकडे शासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ आता राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. भूमि अभिलेख कर्मचारी कृती समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले की, कर्मचाऱ्यांनी विविध स्तरांवरील मागण्यांचा पाठपुरावा केला आहे. यामध्ये प्रामुख्याने तांत्रिक वेतनश्रेणी लागू करणे, भूकरमापक व परिरक्षण भूकरमापक यांच्या वाढीव पदांसह सुधारित आकृतीबंध मंजूर करणे, मोजणी कर्मचाऱ्यांच्या प्रवासभत्त्याचा वेतनामध्ये समावेश करणे आणि विभागाचे खाजगीकरण थांबवणे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. तसेच, तांत्रिक ज्ञान नसलेल्या अधिकाऱ्यांची या विभागात बदली करू नये, शेत रस्ते मोजणीच्या शासन निर्णयात सुधारणा करावी आणि जमाबंदी आयुक्त पद भारतीय अभियांत्रिकी सेवेतून भरावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. प्रशासकीय पातळीवर ई-मोजणी २.० सॉफ्टवेअर युजर फ्रेंडली करणे, कर्मचाऱ्यांवर विनापरवाना थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याची अमानवी पद्धत बंद करणे, प्रत्येक कर्मचाऱ्याला लॅपटॉप आणि रोव्हरसारखे स्वतंत्र साहित्य पुरवणे आणि अतिरिक्त कामाचा मोबदला देणे अशा महत्त्वपूर्ण मागण्या आहेत.  निवेदन स्विकारल्यानंतर मंत्री विखे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी याविषयावर चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संग्राम वडितके, रेव्हेन्यू सोसायटीचे चेअरमन विजय हरिश्चंद्रे, महेश हरिश्चंद्रे, बाळासाहेब गायकवाड, गणेश दळवी, धनंजय राऊत, ज्ञानदेव खुर्पे, अण्णासाहेब चिंधे, कैलास डफळ, उमाकांत भागवत आदी उपस्थित होते.
आंदोलनाच्या नियोजित आराखड्यानुसार, १८ फेब्रुवारी रोजी सर्व कर्मचारी मोजणी साहित्य जमा करून काळ्या फिती लावून काम करतील. २० फेब्रुवारीपासून मोजणी काम पूर्णतः बंद ठेवले जाईल आणि २३ ते २६ फेब्रुवारी दरम्यान राज्यभरात सामूहिक रजा आंदोलन करण्यात येईल. त्यानंतर २७ फेब्रुवारी रोजी पुणे येथील जमाबंदी आयुक्त कार्यालयावर ‘आक्रोश मोर्चा’ काढला जाणार असून, यानंतरही सरकारने दखल न घेतल्यास २ मार्च २०२६ पासून संपूर्ण राज्यात बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा समितीने दिला आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व राज्य समन्वयक सुनील गोडसे, विभूतीचंद्र गजभिये, पवन केवटे, राहुल पाटील, किशोर इंगळे, दिपाली मुरकुटे, सुरज रामटेके, विवेक कोठाळे, कमलाकर पोतदार, संजय बोर्डे, अभय पाटील आणि धनाजी बाबर हे करत असून राज्यभरातील सर्व कर्मचारी या आंदोलनात सहभागी होणार आहेत. कर्मचाऱ्यांच्या या न्याय्य हक्कांच्या लढ्यामुळे मोजणीची कामे ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली असून याची संपूर्ण जबाबदारी शासनाची असेल, असेही समितीने स्पष्ट केले आहे. निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे मुख्य सचिव, तसेच महसूल व वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!