तक्रारदार महिलांना घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जाणार; तृप्ती देसाई यांची दिनकर यांच्या खुलशावर प्रतिक्रिया

desai trupti shrirampur

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- आमच्याकडे ज्या महिला पदाधिकाऱ्यांची तक्रार आली, त्यानुसार आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे रीतसर भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांची तक्रार केली आहे. त्यामुळे यात कुणाची बदनामी करण्याचा प्रश्नच येत नाही.यासंदर्भात लवकरच ज्या महिलांनी आमच्याकडे तक्रार दिली, त्या सर्व महिलांना घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी स्पष्ट केले आहे.
भारतीय जनता पार्टीचे उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी काल केलेल्या खुलशावर तृप्ती देसाई यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तृप्ती देसाई पुढे म्हणाल्या की, नितीन दिनकर यांच्या विरोधात जी लेखी तक्रार महिलांनी आम्हाला दिली त्यानुसार रीतसर मुख्यमंत्र्यांकडे आम्ही तक्रार केलेली आहे, जो त्यांचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाउंटला कधीही अपलोड झालेला नाही.


काही महिन्यांपूर्वी हा व्हिडिओ दिनकर यांनी अपलोड केला असे त्यांचे म्हणणे आहे परंतु महिलांबरोबर नाचताना व दारू पितानाचा हा व्हिडिओ त्यांनी कधीच अपलोड केलेला नाही. नितीन दिनकर हे स्वतःच्या बचावासाठी साफ खोटं बोलत आहेत.


आमच्याकडे जी तक्रार आली त्यानुसार आम्ही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे त्यामुळे कुणाची बदनामी करण्याचा प्रश्नच येत नाही.यासंदर्भात लवकरच ज्या महिलांनी आमच्याकडे तक्रार दिली आहे त्या सर्व महिलांना घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे असे भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी स्पष्ट केले आहे.

 

Leave a Comment

संबंधित बातम्या

भगवंताचे नामस्मरण हीच खरी  संपत्ती-मंहत रामगिरी महाराज;शनी देवगाव येथे गोदातीरी अवतरली प्रतिपंढरी

श्रीरामपूर-हरिनाम व रामनाम घेतल्याने पाप नष्ट होते.मनुष्याला व्यसन लागल्यावर ते सुटत नाही परंतु संताच्या सान्निध्यात आल्यामुळे त्याच्या जिवनात बदल होतो.भगवंताचे नामस्मरण हीच खरी संपत्ती आहे.विस पंचवीस वर्षापूर्वी काही  थोरामोठ्यांचे,संताचे चरित्र पाठ्यपुस्ताकात

कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार-जलसंपदा मंत्री विखे पाटील;नदीजोड प्रकल्पाच्या पहिल्या कार्यालयाचे लोकार्पण

श्रीरामपूर- ‘नदीजोड’च्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार असून पर्जन्यछाया असलेल्या भागांमध्ये जलसिंचनाची मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.नाशिक

साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचे सोने-मंहत रामगिरी महाराज;शनि देवगाव सप्ताहात गोदावरी नदीतीरी लाखो भाविकांची मांदियाळी

श्रीरामपूर-मानवाच्या मन व बुद्धी यांचे शुद्धीकरण करण्यासाठीच आपल्या साधुसंतांनी अखंड हरिनाम सप्ताह सारख्या परंपरा सुरू केल्या.ज्याप्रमाणे परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते,त्याचप्रमाणे साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचेही सोने होते,असे प्रतिपादन महंत रामगिरीजी

लोणी खुर्द येथे घरकुलासाठी ४७ गुंठे जागेचा प्रस्ताव शासनाकडे- मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील; ८ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात

श्रीरामपूर-लोणी खुर्द येथील भीमनगर वसाहतीमधील रहिवाशांना त्यांच्या हक्काचे घरकुल मिळावे, यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शासनाच्या मालकीची ४७ गुंठे जागा निश्चित करून तिचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

Latest News

Trending News