पाटचाऱ्या नादुरूस्तीमुळे शेतकऱ्यांचे भरणे टांगले;प्रजासत्ताक दिनी छावाचा आंदोलनाचा इशारा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाचे रब्बी हंगामाचे प्रथम आवर्तन सुरू असून पाटबंधारे विभागाने रब्बी आवर्तन सुरू होण्यापूर्वी सर्व पाटचाऱ्या दुरूस्त करणे गरजेचे होते. परंतू...

श्रीरामपूर-
भंडारदरा धरणाचे रब्बी हंगामाचे प्रथम आवर्तन सुरू असून पाटबंधारे विभागाने रब्बी आवर्तन सुरू होण्यापूर्वी सर्व पाटचाऱ्या दुरूस्त करणे गरजेचे होते. परंतू पाटबंधारे विभागाने ते न केल्याने अनेक शेतकऱ्यांचे भरणे टांगले आहेत. या पाटचाऱ्यांची लवकरात लवकर दुरूस्ती करून शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवावा, अन्यथा प्रजासत्ताक दिनी पाटबंधारे कार्यालयात आंदोलन करणार असल्याचा इशारा छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांनी दिला आहे.
याबाबत पाटबंधारे विभागाचे उपअभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,यावर्षी अतिवृष्टी झाल्याने अनेक ठिकाणी शेतातील गाळ,माती, दगडधोंडे पाण्यातून वाहत येऊन चारीमध्ये छोटेमोठे भराव तयार झाले आहेत. तसेच अतिपावसाने चारीत गवत मोठ्या प्रमाणात वाढले आहे.पाटचारीकडे पाटपाणी व्यतिरिक्त इतरवेळी संबंधित विभागाचे लक्ष राहत नाही.पाटात पाणी दिसले की मग  जेसीबीचा शोध घेऊन कुठेतरी चारी दुरूस्त करण्याचा केविलवाना प्रयत्न केला जातो.त्यातून प्रत्येक लाभधारक शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहचत नाही. अशीच परिस्थिती सध्या चालू रब्बी हंगामात पहावयास मिळत आहे. ७ जानेवारी २०२६ रोजी सुटलेले आवर्तन बेलपिंपळगाव, कारेगाव, वडाळा या विभागात पोहचले. परंतू त्या ठिकाणी चाऱ्या नादुरूस्त असल्याने अनेक लाभधारक शेतकऱ्यांपर्यंत पाणी गेले नाही.शेतकरी सिंचन शाखेमध्ये चकरा मारतात. ७ नं. अर्ज भरण्यासाठी जातात. तेव्हा त्या सिंचन शाखेमध्ये कोणीही अधिकारी, कर्मचारी उपस्थित नसतो. तसेच पाणी अवर्तन चालू असताना देखील उपअभियंता, पाटकरी कर्मचारी असे कोणीही अधिकारी सिंचन शाखेत भेटत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना  अडचणी येतात. शेतकऱ्यांना पाणी मागणी अर्जाची पोहोच दिली जात नाही.त्याचप्रमाणे पाणीपट्टी भरल्यानंतर पोहोच पावती देण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो. यासह इतर अनेक प्रश्नांसाठी जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर आपण कारवाई करून चालू रब्बी आवर्तनामध्ये पाणी मागणी अर्ज दिलेल्या शेतकऱ्यांचे भरणे राहिल्यास त्यांना  नुकसान भरपाई देणार आहात का? याचा खुलासा करण्याची मागणी  करण्यात आली आहे.तसे ना झाल्यास २६ जानेवारी २०२६ रोजी  कार्यालयासामोर अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीने ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा छावा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!