पाटचाऱ्या नादुरूस्तीमुळे शेतकऱ्यांचे भरणे टांगले;प्रजासत्ताक दिनी छावाचा आंदोलनाचा इशारा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाचे रब्बी हंगामाचे प्रथम आवर्तन सुरू असून पाटबंधारे विभागाने रब्बी आवर्तन सुरू होण्यापूर्वी सर्व पाटचाऱ्या दुरूस्त करणे गरजेचे होते. परंतू...

श्रीरामपूर-
भंडारदरा धरणाचे रब्बी हंगामाचे प्रथम आवर्तन सुरू असून पाटबंधारे विभागाने रब्बी आवर्तन सुरू होण्यापूर्वी सर्व पाटचाऱ्या दुरूस्त करणे गरजेचे होते. परंतू पाटबंधारे विभागाने ते न केल्याने अनेक शेतकऱ्यांचे भरणे टांगले आहेत. या पाटचाऱ्यांची लवकरात लवकर दुरूस्ती करून शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवावा, अन्यथा प्रजासत्ताक दिनी पाटबंधारे कार्यालयात आंदोलन करणार असल्याचा इशारा छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांनी दिला आहे.
याबाबत पाटबंधारे विभागाचे उपअभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,यावर्षी अतिवृष्टी झाल्याने अनेक ठिकाणी शेतातील गाळ,माती, दगडधोंडे पाण्यातून वाहत येऊन चारीमध्ये छोटेमोठे भराव तयार झाले आहेत. तसेच अतिपावसाने चारीत गवत मोठ्या प्रमाणात वाढले आहे.पाटचारीकडे पाटपाणी व्यतिरिक्त इतरवेळी संबंधित विभागाचे लक्ष राहत नाही.पाटात पाणी दिसले की मग  जेसीबीचा शोध घेऊन कुठेतरी चारी दुरूस्त करण्याचा केविलवाना प्रयत्न केला जातो.त्यातून प्रत्येक लाभधारक शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहचत नाही. अशीच परिस्थिती सध्या चालू रब्बी हंगामात पहावयास मिळत आहे. ७ जानेवारी २०२६ रोजी सुटलेले आवर्तन बेलपिंपळगाव, कारेगाव, वडाळा या विभागात पोहचले. परंतू त्या ठिकाणी चाऱ्या नादुरूस्त असल्याने अनेक लाभधारक शेतकऱ्यांपर्यंत पाणी गेले नाही.शेतकरी सिंचन शाखेमध्ये चकरा मारतात. ७ नं. अर्ज भरण्यासाठी जातात. तेव्हा त्या सिंचन शाखेमध्ये कोणीही अधिकारी, कर्मचारी उपस्थित नसतो. तसेच पाणी अवर्तन चालू असताना देखील उपअभियंता, पाटकरी कर्मचारी असे कोणीही अधिकारी सिंचन शाखेत भेटत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना  अडचणी येतात. शेतकऱ्यांना पाणी मागणी अर्जाची पोहोच दिली जात नाही.त्याचप्रमाणे पाणीपट्टी भरल्यानंतर पोहोच पावती देण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो. यासह इतर अनेक प्रश्नांसाठी जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर आपण कारवाई करून चालू रब्बी आवर्तनामध्ये पाणी मागणी अर्ज दिलेल्या शेतकऱ्यांचे भरणे राहिल्यास त्यांना  नुकसान भरपाई देणार आहात का? याचा खुलासा करण्याची मागणी  करण्यात आली आहे.तसे ना झाल्यास २६ जानेवारी २०२६ रोजी  कार्यालयासामोर अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीने ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा छावा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!