श्रीरामपूर-
शिक्षणासोबतच समाजासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करून माऊली प्रतिष्ठानने आपले सामाजिक दायित्व प्रभावीपणे जपले असल्याचे प्रतिपादन आमदार हेमंत ओगले यांनी केले.
माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक ज्ञानेश्वर मुरकुटे व डॉ. वंदनाताई मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली वांगी–भेर्डापूर येथे आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन व कृतज्ञता पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार भानुदास मुरकुटे होते.यावेळी नूतन नगराध्यक्ष करण ससाणे, जिल्हा काँग्रेसध्यक्ष सचिन गुजर, उपजिल्हाधिकारी दत्तात्रय बोरुडे, अच्युत बडाख, बाबुराव बडाख, शांताराम तूवर, भरत साळुंके, विराज भोसले, नितीन भागडे, अर्जुन राऊत, योगेश उंडे, ताजखा पठाण, अरुण कवडे, बाबासाहेब तागड, सौ. भावना शिनगारे, नयन गांधी आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पुढील मान्यवरांना कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.युवा भूषण पुरस्कार ॲड. शुभम फरगडे (मोडी लिपी तज्ज्ञ) ,जीवनगौरव पुरस्कार चंदर बापू दासरजोगी (पाटील, वैदू समाज – निपाणी) ,प्रगतशील शेतकरी म्हणून बापूसाहेब उंडे (मातापुर), सामाजिक कार्यासाठी सौ. हरणाबाई गो. चव्हाण (वारकरी – कारेगाव), अध्यात्मिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सौ. भगीरथीबाई की. गायधने (निपाणी वडगाव) तसेच समाजभूषण पुरस्काराने बाळासाहेब गायकवाड (वडाळा महादेव) यांचा सन्मान करण्यात आला. तसेच यावर्षीचे उत्कृष्ट विद्यार्थी व पालक यांनाही मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
आ. हेमंत ओगले* म्हणाले की, आपल्या कार्यातून समाजासाठी आदर्श निर्माण करणाऱ्या या सर्व व्यक्ती प्रेरणादायी असून सामाजिक, शैक्षणिक, कृषी, आध्यात्मिक व सांस्कृतिक क्षेत्रांत त्यांनी केलेले कार्य नव्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल.कार्यक्रमास संजय कवडे, योगेश बडधे, पवन पाऊलबुधे, जालिंदर दाणे, सुनील भराडी, प्रकाश जाधव, शामसुंदर बडाख , गोरख तारडे तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
