श्रीरामपूरचा पाणीपुरवठा पुर्ववत होणार;सात तारखेपासून भंडारदरा धरणातून आवर्तन

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरासाठी तयार होणाऱ्या नवीन साठवण तलावाचे काम चालू असल्याने व पाणीसाठा कमी झाल्याने जुन्या तलावातील साठवलेले पाणी पाटबंधारे खात्याचे रोटेशन...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर शहरासाठी तयार होणाऱ्या नवीन साठवण तलावाचे काम चालू असल्याने व पाणीसाठा कमी झाल्याने जुन्या तलावातील साठवलेले पाणी पाटबंधारे खात्याचे रोटेशन येईपर्यंत पुरविणे गरजेचे असल्याने पंधरा दिवसापासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.सात तारखेला भंडारदर्‍यातून पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीसाठी आवर्तन सोडले जाणार आहे. सदरचे पाणी नऊ तारखेपर्यंत श्रीरामपुरात येईल.त्यामुळे दहा तारखेपासून शहरवासीयांचा दररोजचा पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन सात तारखेला पिण्याचे पाण्याचे रोटेशन सोडण्याचे आदेश केले.सदरचे रोटेशन महिनाभर चालणार असल्याने तोपर्यंत शहराला दररोज पाणीपुरवठा करण्यात येईल.त्यानंतर पुन्हा दिवसाआड पाणी पुरवठा केला जाईल अशी माहिती नगरपालिका सूत्रांनी दिली आहे.
नगरपालिका प्रशासनाने कॅनलचे लांबलेले रोटेशन पाहता आहे ते पाणी महिनाभर शहरवासीयांना पुरावे यासाठी दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला.त्यानंतर नगराध्यक्ष करण ससाणे व आमदार हेमंत ओगले यांनी तातडीने तलावाची पाहणी करून पाटबंधारे खात्याशी संपर्क केला व पाणी रोटेशन लवकर सोडण्याबाबत विनंती केली.शहरात अनेकांना अभूतपूर्व अशा पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. ही पाणीटंचाई पाहून नागरिकांना ४० वर्षांपूर्वीचे दिवस आठवत आहेत.
साठवण तलावाचे बांधकाम सुरू असताना पालिका प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाई भासू नये म्हणून साठवण तलावाच्या मध्ये भिंत घालून तलावाचे दोन भाग करून एका भागात पाणी साठवले होते.परंतु अचानकपणे हा भराव वाहून गेल्याने तलाव परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले त्यानंतर तो भरावच काढून टाकला. त्यामुळे पाणीसाठा करणे शक्य झालेले नाही.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या पाईपलाईन देखील जुन्या झाल्या आहेत. त्या वारंवार लिकेज होतात तसेच वीज टंचाईमुळे शहरातील अनेक भागातील लोक त्रस्त असून त्यामुळे देखील पाणीटंचाई निर्माण होते.कारण ज्यावेळी पाणी सुटते त्याचवेळी लाईट गेलेली असते तर काही वेळा लाईट असते मात्र पुरेसे होल्टेज नसल्याने पाणी वर टाकीमध्ये जातच नाही अशा अनेक समस्या सध्या आहेत.नगराध्यक्ष करण ससाणे यांनी पाणीपुरवठा विभागाच्या सर्व अधिकारी,कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन श्रीरामपूरची पाणीपुरवठा स्थिती समजून घेतली आहे. त्या दृष्टीने आता पावले उचलली जात असून भविष्य काळामध्ये शहरवासीयांना पाणीटंचाई भासणार नाही याकडे नगरपालिका प्रशासन लक्ष देत आहे.

शहरातील पाणी पुरवठा तलावाचे काम प्रगतीपथावर सुरू आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!