श्रीरामपूरचा पाणीपुरवठा पुर्ववत होणार;सात तारखेपासून भंडारदरा धरणातून आवर्तन

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरासाठी तयार होणाऱ्या नवीन साठवण तलावाचे काम चालू असल्याने व पाणीसाठा कमी झाल्याने जुन्या तलावातील साठवलेले पाणी पाटबंधारे खात्याचे रोटेशन...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर शहरासाठी तयार होणाऱ्या नवीन साठवण तलावाचे काम चालू असल्याने व पाणीसाठा कमी झाल्याने जुन्या तलावातील साठवलेले पाणी पाटबंधारे खात्याचे रोटेशन येईपर्यंत पुरविणे गरजेचे असल्याने पंधरा दिवसापासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.सात तारखेला भंडारदर्‍यातून पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीसाठी आवर्तन सोडले जाणार आहे. सदरचे पाणी नऊ तारखेपर्यंत श्रीरामपुरात येईल.त्यामुळे दहा तारखेपासून शहरवासीयांचा दररोजचा पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन सात तारखेला पिण्याचे पाण्याचे रोटेशन सोडण्याचे आदेश केले.सदरचे रोटेशन महिनाभर चालणार असल्याने तोपर्यंत शहराला दररोज पाणीपुरवठा करण्यात येईल.त्यानंतर पुन्हा दिवसाआड पाणी पुरवठा केला जाईल अशी माहिती नगरपालिका सूत्रांनी दिली आहे.
नगरपालिका प्रशासनाने कॅनलचे लांबलेले रोटेशन पाहता आहे ते पाणी महिनाभर शहरवासीयांना पुरावे यासाठी दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला.त्यानंतर नगराध्यक्ष करण ससाणे व आमदार हेमंत ओगले यांनी तातडीने तलावाची पाहणी करून पाटबंधारे खात्याशी संपर्क केला व पाणी रोटेशन लवकर सोडण्याबाबत विनंती केली.शहरात अनेकांना अभूतपूर्व अशा पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. ही पाणीटंचाई पाहून नागरिकांना ४० वर्षांपूर्वीचे दिवस आठवत आहेत.
साठवण तलावाचे बांधकाम सुरू असताना पालिका प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाई भासू नये म्हणून साठवण तलावाच्या मध्ये भिंत घालून तलावाचे दोन भाग करून एका भागात पाणी साठवले होते.परंतु अचानकपणे हा भराव वाहून गेल्याने तलाव परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले त्यानंतर तो भरावच काढून टाकला. त्यामुळे पाणीसाठा करणे शक्य झालेले नाही.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या पाईपलाईन देखील जुन्या झाल्या आहेत. त्या वारंवार लिकेज होतात तसेच वीज टंचाईमुळे शहरातील अनेक भागातील लोक त्रस्त असून त्यामुळे देखील पाणीटंचाई निर्माण होते.कारण ज्यावेळी पाणी सुटते त्याचवेळी लाईट गेलेली असते तर काही वेळा लाईट असते मात्र पुरेसे होल्टेज नसल्याने पाणी वर टाकीमध्ये जातच नाही अशा अनेक समस्या सध्या आहेत.नगराध्यक्ष करण ससाणे यांनी पाणीपुरवठा विभागाच्या सर्व अधिकारी,कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन श्रीरामपूरची पाणीपुरवठा स्थिती समजून घेतली आहे. त्या दृष्टीने आता पावले उचलली जात असून भविष्य काळामध्ये शहरवासीयांना पाणीटंचाई भासणार नाही याकडे नगरपालिका प्रशासन लक्ष देत आहे.

शहरातील पाणी पुरवठा तलावाचे काम प्रगतीपथावर सुरू आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!