जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणाशी बंटी जहागीरदार यांचा संबंध नाही-नगरसेवक रईस जागीरदार

श्रीरामपूर-बंटी जहागीरदार यांचा पुणे येथील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणाशी दुरान्वयानेही संबंध नाही.जंगली महाराज रोडवर झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये जहागीरदार यांच्याविरुद्ध कोणतेही सबळ पुरावे...

श्रीरामपूर-
बंटी जहागीरदार यांचा पुणे येथील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणाशी दुरान्वयानेही संबंध नाही.जंगली महाराज रोडवर झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये जहागीरदार यांच्याविरुद्ध कोणतेही सबळ पुरावे मिळाले नसल्याचे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्टपणे नोंदवले आहे.जहागीरदार यांच्या हत्येनंतर त्यांची बॉम्बस्फोटातील आरोपी म्हणून सर्वत्र जाणिवपूर्वक बदनामी करण्यात आल्याचा आरोप त्यांचे बंधू नगरसेवक रईस जहागीरदार यांनी पत्रकार परिषदेत
केला.
ते पुढे म्हणाले की,पुण्यातील जर्मन बेकरी येथे १३ फेब्रुवारी २०१० मध्ये बॉम्बस्फोट झाले होते.या प्रकरणामध्ये मिर्झा बेग,मोहसीन चौधरी,यासीन भटकल,रियाज भटकल, इकबाल भटकल,फय्याज कागझी आणि जैबुद्दीन अन्सारी हे सात आरोपी होते.असे असताना जर्मन बेकरी बॉम्बस्फोटामध्ये बंटी जहागीरदार यांचे नाव पूर्णतः बदनामीच्या उद्देशाने गोवण्यात आले आहे.मुंबई उच्च न्यायालयाने १ ऑक्टोबर २०१५ रोजीच्या आपल्या आदेशामध्ये या बॉम्बस्फोट प्रकरणांमध्ये बंटी जहागीरदार विरुद्ध कोणतेही सबळ पुरावे प्रथमदर्शनी दिसून येत नसल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे.असे असताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पोलिस दलाच्या एका कार्यक्रमामध्ये बंटी जहागीरदार यांना जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी म्हटले आहे.त्यांचे हे म्हणणे चुकीच्या माहितीवर आधारित आहे. माध्यमांमध्येही बंटी जहागीरदार यांच्या हत्येनंतर त्यांना जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी म्हणून संबोधले गेले.वास्तविक हे कायदेशीर आणि मानवतेच्या दृष्टीने चुकीचे आहे,असे रईस जहागीरदार यांनी म्हटले आहे.बंटी जहागीरदार यांच्या हत्या प्रकरणात सागर उर्फ चन्या बेग,आकाश उर्फ टिप्या बेग, सोनू उर्फ जयप्रकाश बेग हेच मुख्य सूत्रधार आहेत,असा आरोपही रईस जहागीरदार यांनी केला आहे. बेग बंधूंवर कोणकोणते गुन्हे दाखल आहेत याचा तपशीलही त्यांनी दिला.या तिघांवर संगमनेर येथील एका अल्पवयीन हिंदू मुलीच्या अत्याचाराचा गुन्हा (केस नंबर 52/2014, ता. 20/08/2014) दाखल आहे. त्या प्रकरणात संगमनेर सत्र न्यायालयात वरील तीनही आरोपीविरुद्ध वॉरंट बजावलेला आहे. असे असताना पोलिस या तीनही आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर करत नाही. उलटपक्षी तीनही आरोपी श्रीरामपूरमध्ये खुलेआमपणे वावरत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला उपस्थित राहत आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून निवडणुका लढवत आहेत.कोर्टाने त्यांना फरार घोषित करण्याची कारवाई सुरू केलेली आहे.पोलिस यंत्रणेचे बेग बंधूंना असलेले आशीर्वाद पाहता बंटी जहागीरदार यांच्या हत्या प्रकरणात सागर उर्फ चन्या बेग, आकाश उर्फ टिप्या बेग, सोनू उर्फ जयप्रकाश बेग यांच्याविरुद्ध पोलिस यंत्रणा कारवाई करतील याविषयी आम्हाला मोठी शंका आहे,असेही रईस जहागीरदार यांनी म्हटले आहे.
या हत्येबाबत तपासामध्ये कोणतीही प्रगती अद्याप दिसत नाही.पोलिसांवर बाह्य शक्तींचा प्रचंड दबाव असल्याचे दिसून येत आहे. हत्येसाठी वापरलेले हत्यार अद्याप जप्त नाही. दुचाकी जप्त नाही. जे मुख्य सूत्रधार आहे त्यांच्यावर एकूण २६ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी १३ गुन्हे एकट्या श्रीरामपूर पोलीस स्टेशनला दाखल आहेत.एमपीडीए चा गुन्हा काढून टाकून ते राजकारण करीत आहेत.या गुन्ह्याशी संबंधित त्यांच्या फायली जाळण्यात आल्याचा गंभीर आरोप नगरसेवक मुझफ्फर शेख यांनी यावेळी केला.या हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे देण्यात यावा अशी मागणी आम्ही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.याप्रकरणी दाद मागण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाऊ, पालकमंत्र्यांनाही भेटू. तसेच पोलिसांकडून न्याय न मिळाल्यास सर्व समाज घटकांना सोबत घेऊन जिल्हाभर आंदोलन उभे करण्यात येईल असेही शेख यांनी सांगितले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!