बियाणे आणि किटकनाशकांतील फसवणूक रोखण्यासाठी नवा कायदा-केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान

श्रीरामपूर-बियाणे आणि रासायनीक औषधांच्‍या माध्यमातून शेतक-यांचे फसवणूक टाळण्‍यासाठी नवीन बियाणे, किटकनाशक कायदा केंद्र सरकार आणणार असून, निकृष्‍ठ बियाणे आणि किटकनाशकांमुळे पिकांचे...

श्रीरामपूर-
बियाणे आणि रासायनीक औषधांच्‍या माध्यमातून शेतक-यांचे फसवणूक टाळण्‍यासाठी नवीन बियाणे, किटकनाशक कायदा केंद्र सरकार आणणार असून, निकृष्‍ठ बियाणे आणि किटकनाशकांमुळे पिकांचे नुकसान झाल्‍यास शेतक-यांना पुर्ण नुकसान भरपाई मिळावी म्‍हणून, दंडात्मक व फौजदारी कायद्याची तरतुद करणार असल्‍याची माहीती केंद्रीय कृषी तथा ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली.

मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बाभळेश्‍वर येथील कृषी विज्ञान केंद्रामध्‍ये येवून शेतक-यांशी संवाद साधला. तसेच केंद्र सरकारच्‍या माध्‍यमातून कृषी आणि ग्रामीण विकास मंत्रालयाच्‍या योजनां बाबतची माहीती त्‍यांनी उपस्थित शेतक-यांना दिली. लाडक्‍या बहीणीला लखपती दिदि करण्‍याबाबत केंद्र सरकार कुठेही कमी पडणार नसल्‍याचे आश्‍वासनही त्‍यांनी दिले.

जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या अध्‍यक्षतेखाली संपन्‍न झालेल्‍या शेतकरी संवाद कार्यक्रमास माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, कुलगुरु डॉ.विलास खर्चे, जिल्‍हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्‍य कार्यकारी आधिकारी डॉ.आनंद भंडारी, आयसीएआरचे संचालक डॉ.एस.के रॉय, कृषी उपसंचालक रफीक नाईकवाडी, डॉ.भास्‍करराव खर्डे, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष नितीन दिनकर, सभापती ज्ञानेश्‍वर गोंदकर, नगराध्‍यक्षा सौ.जयश्री थोरात, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ.उत्‍तमराव कदम आदि याप्रसंगी उपस्थित होते.

मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी बोलताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे अभियान हे शेतापासून ते लखपती दिदि यांना प्रोत्‍साहन देवूनच देशामध्‍ये कार्यरत आहे. जनसामान्‍यांच्‍या  जीवनातील बदलांसाठी केंद्र सरकार सर्व स्‍तरावर काम करीत असून, कृषी आणि ग्रामीण विकासाच्‍या माध्‍यमातून परिवर्तन आणण्‍यासाठी केंद्र सरकार कटीबध्‍द आहे. केंद्र सरकारच्‍या ग्रीन हाऊस, पॉलिहाऊस तसेच हॉर्टीकल्‍चर योजनांचे अनुदान मिळण्‍यास होत असलेला उशिर लक्षात घेवून यासाठी नवी रचना करण्‍याबाबत विचार केला जाईल. नैसर्गिक शेती मधून उत्‍पादीत होणा-या मालाचे प्रमाणीकरण करण्‍यासाठी स्वतंत्र व विश्‍वासार्ह यंत्रणा कार्यान्वित करताना मालाला दुप्‍पट भाव मिळण्‍याबाबतही प्रयत्‍न करणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

युरिया मिळण्‍याच्‍या बाबतीत होत असलेल्‍या विलंबाबत         शेतक-यांनी उपस्थित केलेल्‍या प्रश्‍नावर मंत्री चौहान  म्‍हणाले की, अंतरराष्‍ट्रीय परिस्‍थितीमुळे यावर्षी युरिया मिळण्‍यात चाळीस दिवस लागले. परंतू ही परिस्थिती आता बदलेले मात्र जादा दराने युरिया विकून शेतक-यांची लुट करणा-यांना सरकार सोडणार नाही. बियाणे आणि रासायनिक औषधांच्‍या माध्‍यमातून शेतक-यांची फसवणूक करणा-या कंपन्‍यांच्‍या  विरोधात सिड अॅक्‍ट आणि पेस्‍टीसाईड अॅक्ट पुढील अर्थसंकल्‍पीय आधिवेशनात आम्‍ही आणणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

पिक नुकसानीचे अचूक पंचनामे होण्‍यासाठी जिल्‍हाधिका-यांना आपण निर्देश दिले असून, विमा रक्‍कम मिळण्‍यास उशिर झाल्‍यास कंपन्‍यांच्‍या माध्‍यमातून शेतक-यांना अधिकची मदत मिळवून देण्‍यासाठी प्रयत्‍न केले जाणार आहेत.

ग्रामीण विकास विभागाच्‍या माध्यमातून लखपती दिदि अभियान निरंतर सुरु राहणार असून, मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या  नेतृत्‍वाखाली राज्‍य सरकारचेही चांगले काम सुरु आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्‍या माध्‍यमातून केंद्र सरकारने राज्‍याला २९ लाख घरं मंजुर केले असून, अहिल्‍यानगर जिल्‍ह्याला १ लाख ६० हजार घरं मंजुर झाले असल्‍याची माहीतीही त्‍यांनी आपल्‍या भाषणात दिली.

कार्यक्रमाचे अध्‍यक्ष मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी अहिल्‍यानगर जिल्‍ह्यामध्‍ये कृषी विभागाच्‍या सुरु असलेल्‍या कामाचा आढावा घेवून विद्यापीठांनी आता कालबाह्य झालेल्‍या अ‍भ्‍यासक्रमांबाबत विचार करण्‍याची गरज व्यक्‍त केली.एकीकडे तंत्रज्ञान बदलत आहे मात्र कृषी अभ्‍यासक्रमात मात्र बदल होत नाही. यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेने अभ्‍यासक्रम बदलासाठी दहा वर्षांची अट रद्द करावी अशी विनंती त्यांनी  आपल्‍या भाषणात केली. त्‍याची दखल घेवून मंत्री चौहान यांनी याबाबत निश्चितच गांभिर्याने विचार करण्‍याचे आश्‍वासन दिले.केंद्र व राज्‍य सरकारच्‍या अनुदानातून मंजुर झालेल्‍या लाभार्थी शेतक-यांना कृषी औजारांचे वितरण, प्रयोगशिल शेतक-यांचा सन्‍मान आणि बचत गटांच्‍या स्‍टॉलचे उद्घाटन मंत्री चौहान यांच्‍या उपस्थितीत करण्‍यात आले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!