पोलिसांच्या हाती महत्वाचे धागेदोरे;कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवावी-पोलीस उपअधीक्षक भवर

श्रीरामपूर-बंटी जहागीरदार यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेच्या तपासात पोलिसांच्या हाती काही महत्वाचे धागेदोरे लागलेले आहेत.घटनास्थळी फॉरेन्सिकची टीम बोलावून तपासला गती देण्यात आली...

श्रीरामपूर-
बंटी जहागीरदार यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेच्या तपासात पोलिसांच्या हाती काही महत्वाचे धागेदोरे लागलेले आहेत.घटनास्थळी फॉरेन्सिकची टीम बोलावून तपासला गती देण्यात आली आहे.काही व्हिडीओ फुटेज पोलिसांना तपासादरम्यान मिळाले असून त्यात आरोपी दिसत आहेत. त्यावरुन त्यांची ओळख पटवून शोध घेण्याचे काम सुरू आहे.अद्याप गोळीबार करणाऱ्या आरोपींची नावे निष्पन्न झाली नसली तरी त्यांना अटक केल्याशिवाय पोलीस प्रशासन स्वस्थ बसणार नाही, तोपर्यंत सर्वांनी शांतता राखावी असे आवाहन पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवर यांनी केले आहे.
शहरातील कॉलेज रोड परिसरातील संतलुक हॉस्पिटल जवळ मंगळवार दि.31 डिसेंबर रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी बंटी जहागीरदार यांच्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण आहे.जहागिरदार यांना छाती व पोटात गोळ्या लागल्याने त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत असल्याने श्रीरामपूर शहरात त्यांचे समर्थक चिंतेत आहेत.त्या पार्श्वभूमीवर भवर यांनी हे आवाहन केले आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर पुढे म्हणाले की, पोलिसांनी घटनेनंतर  तात्काळ घटनास्थळी धाव घेत गुन्ह्यातील पुरावे गोळा केले.यातील तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण करून पुढील तपास सुरू आहे.पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आली आहेत.यात स्थानिक गुन्हे शाखेची देखील मदत घेतली जात आहे.आरोपींनी गोळीबार करताना पिस्टल वापर केलेला दिसत आहे.तपास पथकाकडून सर्व पुरावे बारकाईने गोळा करून तपासले जात आहेत जेणे करून भविष्यात देखील या गुन्ह्याच्या तपासात कुठल्याही प्रकारच्या त्रुटी राहू नयेत याची काळजी घेतली जात आहे.त्यामुळे प्रशासनाला सहकार्य करून शांतता अबाधित ठेऊन कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी,असे आवाहन पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवर यांनी केले आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!