श्रीरामपूर नगरपालिकेत अभियंत्याची कर्मचाऱ्यास धक्काबुक्की शहर पोलिस ठाण्यात अदखल पात्र गुन्ह्याची नोंद

A_tense_office_confrontation_between_a_municipal_engi_2

श्रीरामपूर (प्रतिनिधी)-

श्रीरामपूर नगर परिषदेतील अधिकारी व कर्मचऱ्यांमधील वादाच्या घटना कमी होण्याऐवजी वाढत चालल्या आहेत. आता तर वीज विभागातील अभियंत्याने थेट कंत्राटी कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. संदिप वायकर या कर्मचाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी मनोज मोरे या अभियंत्याविरूद्ध अदखल पात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी तसेच सर्व विभागात लेखी तक्रारही पाठविण्यात आली आहे.

तक्रारीत म्हटले आहे की, संदिप हौशीराम वायकर हे गेल्या पाच वर्षांपासून मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत कंत्राटी पद्धतीने डाटा ऑपरेटर म्हणून पालिकेत कार्यरत आहे. त्यांची नियुक्ती वीज विभागात करण्यात आली होती. दरम्यान गेल्या पाच महिन्यापूर्वी मनोज संजय मोरे हे वीज विभागात अभियंता म्हूणन बदलून आले. त्यांनंतर वायकर व मोरे यांच्यात अनेकदा कामावरून व इतर कारणावरून खटके उडत होते. मोरे हे मद्यपान करून कामावर येत असल्याचा आरोपही तक्रारीमध्ये केला आहे. मद्यधुंद अवस्थेत मोरे कार्यालयात वायकर यांच्यावर चिडचीड करणे, शविगाळ करणे, मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणे वाजवणे तसेच गुलामासारखी वागणूक देत होते. शिवाय कुठलेही कारण नसताना १८ जून रोजी वायकर यांना कामावरून काढून टाकत आपल्या पत्नीला ठेकेदाराकरवी कंत्राटी पदावर नियुक्त करून घेतले.

वायकर यांनी याबाबत मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी मोरे यांना समज दिली. मात्र त्यांच्या वगणुकीत कुठलाही बदल झाला नाही. उलट १९ जून रोजी वायकर कामावर आले असता. मोरे यांनी त्यांना खुर्चीतून उठण्यास व बाहेर जाण्यास सांगितले. वायकर यांनी नकार दिल्यानंतर मोरे यांनी वायकर यांना गचांडीस धरून बाहेर ढकलले. त्यांना धक्काबुककी व शिवीगाळ केली. घडला प्रकार प्रारंभी उपमुख्याधिकारी यांच्याकडे व नंतर मुख्याधिकारी यांना सांगण्यात आला. आता वाकयर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर शहर पोलिसांनी मोरे यांच्या विरूद्ध अदलख पात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

पाच महिन्यांपासून वाद…

गेल्या पाच महिन्यांपासून त्यांच्यात वाद सुरू आहेत. वायकर यांनी याबाबत माझ्याकडे तक्रारही केली होती. काल त्यांच्यात भांडणे झाल्याची माहिती आहे. दोघांची बाजू समजावून घ्यावी लागेल.

  • मच्छिंद्र घोलप, मुख्याधिकारी, नगर परिषद श्रीरामपूर

Leave a Comment

संबंधित बातम्या

भगवंताचे नामस्मरण हीच खरी  संपत्ती-मंहत रामगिरी महाराज;शनी देवगाव येथे गोदातीरी अवतरली प्रतिपंढरी

श्रीरामपूर-हरिनाम व रामनाम घेतल्याने पाप नष्ट होते.मनुष्याला व्यसन लागल्यावर ते सुटत नाही परंतु संताच्या सान्निध्यात आल्यामुळे त्याच्या जिवनात बदल होतो.भगवंताचे नामस्मरण हीच खरी संपत्ती आहे.विस पंचवीस वर्षापूर्वी काही  थोरामोठ्यांचे,संताचे चरित्र पाठ्यपुस्ताकात

कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार-जलसंपदा मंत्री विखे पाटील;नदीजोड प्रकल्पाच्या पहिल्या कार्यालयाचे लोकार्पण

श्रीरामपूर- ‘नदीजोड’च्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार असून पर्जन्यछाया असलेल्या भागांमध्ये जलसिंचनाची मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.नाशिक

साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचे सोने-मंहत रामगिरी महाराज;शनि देवगाव सप्ताहात गोदावरी नदीतीरी लाखो भाविकांची मांदियाळी

श्रीरामपूर-मानवाच्या मन व बुद्धी यांचे शुद्धीकरण करण्यासाठीच आपल्या साधुसंतांनी अखंड हरिनाम सप्ताह सारख्या परंपरा सुरू केल्या.ज्याप्रमाणे परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते,त्याचप्रमाणे साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचेही सोने होते,असे प्रतिपादन महंत रामगिरीजी

लोणी खुर्द येथे घरकुलासाठी ४७ गुंठे जागेचा प्रस्ताव शासनाकडे- मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील; ८ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात

श्रीरामपूर-लोणी खुर्द येथील भीमनगर वसाहतीमधील रहिवाशांना त्यांच्या हक्काचे घरकुल मिळावे, यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शासनाच्या मालकीची ४७ गुंठे जागा निश्चित करून तिचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

Latest News

Trending News