खानापूर–उंदीरगाव शिवरस्त्याच्या कामाला प्रारंभ;पालकमंत्री विखे पाटील यांच्या विशेष निधीतुन रस्त्याचे काम

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव येथील खानापूर ते उंदीरगाव या महत्त्वाच्या शिवरस्त्याच्या कामाला राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव येथील खानापूर ते उंदीरगाव या महत्त्वाच्या शिवरस्त्याच्या कामाला राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष निधीतून अखेर प्रारंभ झाला आहे. नामदार विखे पाटील यांचे  समर्थक व ज्येष्ठ नेते गिरीधर आसने, भाजपचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, भाऊसाहेब बांद्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या रस्त्याच्या कामाचा आज अधिकृत शुभारंभ करण्यात आला.
सदर रस्ता अनेक वर्षांपासून दुर्लक्षित अवस्थेत होता. या परिसरात आसने, दळे व बांद्रे कुटुंबीयांची मोठी वस्ती असून पावसाळ्याच्या दिवसांत रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था होत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. चिखल, खड्डे आणि खराब दळणवळणामुळे शाळकरी मुले, वृद्ध नागरिक तसेच शेतकऱ्यांना ये-जा करणे कठीण झाले होते. शेतमाल वाहतूक तसेच दैनंदिन गरजांसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असूनही अनेक वर्षे त्याकडे दुर्लक्ष झाले होते.
या समस्येची गांभीर्याने दखल घेत ज्येष्ठ नेते गिरीधर आसने यांनी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे या रस्त्याच्या कामाबाबत सातत्याने पाठपुरावा केला. नागरिकांच्या अडचणी समजून घेत नामदार विखे पाटील यांनी या प्रश्नाची तात्काळ दखल घेत सदर रस्त्यासाठी निधी मंजूर केला आणि कोणताही विलंब न करता रस्त्याच्या कामास सुरुवात केली.
या रस्त्याच्या कामामुळे खानापूर, उंदीरगाव, माळवाडगाव, माळेवाडी तसेच परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून दळणवळण अधिक सुलभ होणार आहे. विशेषतः पावसाळ्यात होणारा त्रास कमी होऊन नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सदर रस्त्याचे काम सुरू केल्याबद्दल निवृत्ती आसने, सोपान आसने, नानासाहेब आसने, गणेश आसने, जनार्धन दळे आदी ग्रामस्थांनी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, ज्येष्ठ नेते गिरीधर आसने, भाजपचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, भाऊसाहेब बांद्रे यांचे आभार व्यक्त केले आहेत. यावेळी विजय सिताराम आसने, पाराजी दळे, दत्तात्रय दळे, भागचंद दळे, कारभारी दळे, डॉ. दादासाहेब आदिक, आण्णासाहेब आसने, शिवाजी आसने, नानासाहेब आसने, मच्छिन्द्र दळे, सतीश आसने, प्रसाद जगरूपे, अमोल मोरे, अविनाश दळे, अशोक दळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

“तालुक्यातील अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या शिवरस्त्यांच्या कामांना लवकरच राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून प्रारंभ होणार असून ग्रामीण भागातील दळणवळण सुलभ करण्यासाठी प्राधान्याने कामे केली जातील,” अशी माहिती ज्येष्ठ नेते गिरीधर आसने यांनी दिली.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!