पिण्याच्या पाण्यासाठी अतिरिक्त आवर्तनाची मागणी करू;नगराध्यक्ष ससाणे यांच्याकडून पाणीपुरवठ्याचा आढावा
श्रीरामपूर-पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची तडजोड चालणार नाही यामागे काय होते काय झाले यात पडायचे नाही श्रीरामपुरात पिण्याचे पाणी स्वच्छ व...
श्रीरामपूर- पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची तडजोड चालणार नाही यामागे काय होते काय झाले यात पडायचे नाही श्रीरामपुरात पिण्याचे पाणी स्वच्छ व मुबलक प्रमाणात नागरिकांना द्या अशा सूचना नवनिर्वाचित लोकनियुक्त अध्यक्ष करण ससाणे यांनी नगरपरिषद अधिकाऱ्यांना दिले आहेत. आ.हेमंत ओगले यांच्या मार्फत आपण पिण्याच्या पाण्यासाठी अतिरिक्त आवर्तनाची मागणी करणार असल्याचे देखील ससाणे यांनी सांगितले. काल नगरपरिषदेने जाहीर केले की एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार त्या संदर्भात तातडीने नगराध्यक्ष ससाणे यांनी नगरसेवकांसह साठवण तलाव गाठत पाहणी केली आणि पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन गुजर, शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, बाबासाहेब दिघे, ज्येष्ठ नगरसेवक मुजफ्फर शेख, दिलीप नागरे, राजेंद्र पवार सर, योगेश जाधव, रईस जहागिरदार, कलीम कुरेशी, लकी सेठी, सुभाष पोटे, दिपक वमने, बिट्टू कक्कड, निलेश नागले, संतोष परदेशी, रितेश एडके, अफरोज शहा, प्रवीण कोठावळे, अभिजित लिप्टे, सिद्धार्थ सोनवणे, सागर कुऱ्हाडे, भाग्येश लोखंडे, अतुल शेटे, नगरआभियंता अभिजित मराठे, निलेश बकाल उपस्थित होते. नगराध्यक्ष ससाणे म्हणाले की, श्रीरामपूर शहरातील नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे विशेष लक्ष देणारा असून त्यामध्ये पाणी, आरोग्य, लाईट आणि बांधकाम या विभागांमध्ये तातडीनं बदल करणे आवश्यक आहे त्याबाबत आपण लवकरच निर्णय घेऊ असे देखील ससाणे यांनी म्हटले आहे.नगराध्यक्ष ससाने हे लवकरच नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारणार असून त्या अगोदर त्यांनी साठवण तलावाची पाहणी करून पिण्याच्या पाण्याचा आढावा घेतला आहे.
नगराध्यक्ष करण ससाणे यांनी नगराध्यक्ष होताच पिण्याच्या पाण्याचे आवर्तन तातडीने सोडण्याबाबत पहिले पत्र देत मागणी केली. श्रीरामपूर तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार स्व. जयंतराव ससाणे, राजश्रीताई ससाणे यांच्या कार्यशैली प्रमाणेच करण ससाणे यांचे कामकाज राहिल,अशी अपेक्षा नागरिकांतुन व्यक्त केली जात आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223
श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा
श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले
श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल
श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद
श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून
श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी