पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ‘ऍक्शन मोड’मध्ये;श्रीरामपूरात नागरिकांच्या समस्यांवर थेट संवाद साधत तात्काळ तोडगा

श्रीरामपूर-शहरात नगरपालिकेच्या निवडणुक प्रचाराने वेग घेतला असून प्रचारासाठी अवघे दोनच दिवस उरले असल्याने सर्व उमेदवारांची प्रचंड धावपळ उडाली आहे. महायुती कडून...

श्रीरामपूर-
शहरात नगरपालिकेच्या निवडणुक प्रचाराने वेग घेतला असून प्रचारासाठी अवघे दोनच दिवस उरले असल्याने सर्व उमेदवारांची प्रचंड धावपळ उडाली आहे. महायुती कडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असलेले श्रीनिवास बिहाणी यांचे नाव अगदी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी जाहीर झाल्याने त्यांना प्रचारासाठी तुलनेने जरा कमी वेळ मिळाला होता. त्यामुळे त्यांच्या प्रचारातली ती उणीव भरून काढण्यासाठी खुद्द जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीरामपूरात भाजप राष्ट्रवादी युतीची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत.गेल्या दोन दिवसांत विखे पाटील पुन्हा दुसऱ्यांदा शहरात दाखल झाले आहेत. प्रचार संपण्याच्या दिवशीही ते पुन्हा शहरात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासून ते शहरातील विविध प्रभागातील स्थानिक नेत्यांशी चर्चा करत होते. त्यांच्या त्यांच्या प्रभागातील महत्वाच्या नागरी समस्यांवर विखे पाटील यांनी तात्काळ निर्णय घेत कार्यवाहीचे आश्वासन नागरीकांना दिले.विखे पाटील यांच्या धडक कार्यवाहीमुळे युतीच्या नेते मंडळींच्याही उत्साहाला उधाण आले. काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार करण ससाणे यांच्या तुलनेत प्रचारात पिछाडीवर पडलेल्या युतीच्या बिहाणी यांनी आता निवडणूकित चांगलीच झेप घेतल्याचे चित्र आहे.त्याला विखे पाटील यांचे सातत्याने शहरात सुरू असलेले दौरे कारणीभूत ठरत आहेत.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वार्ड क्रमांक दोन तसेच मिल्लतनगर भागामध्ये नागरिकांशी संवाद साधून झंझावाती दौरा केला.पहिल्यांदाच या भागात भाजपचे पुढारी या निमित्ताने दिसून आले.त्यांच्या या दौऱ्याला या परिसरातील नागरिकांनी सुद्धा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. काजीबाबा रोड येथे त्यांनी उपस्थितांशी हिंदी आणि उर्दूतून संवाद केला.आजपर्यंत  ज्यांना मतदान केले त्यांनी कोणतेही प्रश्न सोडवले नाही. संगमनेरमध्ये तर काँग्रेसचे पंजा चिन्हच गायब झाले आहे, असे सांगून दहशतीचे राजकारण कोण करतय हे आपण निवडणुकीनंतर पाहू.येणाऱ्या काळात या संपूर्ण भागाचा विकास करू.विकासाच्या पर्वाला आपण सुरुवात करू या. तुम्ही आम्हाला साथ द्या ‘इन्शाल्लाह मै सब करके दिखाऊंगा’ असे म्हणत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव अविनाश आदिक,उमेदवार श्रीनिवास बिहानी,ताहेर बागवान, नितीन दिनकर,दीपक पटारे, साजिद मिर्झा, समीन बागवान,इंद्रनाथ पाटील थोरात,शरद नवले, केतन खोरे, अभिषेक खंडागळे,किशोर बनसोडे,खंडेराव सदाफळ,आसिफ  पोपटिया,अकिल सुन्नाभाई आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मिल्लतनगर येथे मतदारांशी संवाद साधताना नामदार विखे यांनी उपस्थित नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यास सांगितले. यावेळी संजयनगर, रामनगर, मिल्लतनगर, फातिमा कॉलनी या परिसरातील नागरिकांनी विशिष्ट महिलांनी आपल्या समस्यांचा पाढाच वाचला.
संजय नगर ईदगाह परिसरामध्ये सायंकाळ नंतर मुलींना बाहेर निघणे सुद्धा मुश्किल होते.  रात्री मद्यपी लोक त्रास देतात. चोऱ्या होतात. पोलीस लक्ष देत नाही,अशा अनेक समस्या उपस्थित महिलांनी मांडल्या.इथून पुढे आता तुम्हाला हा सर्व त्रास होणार नाही, यासाठी पावले उचलले जातील असे सांगितले.तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांना फोन करून संजय नगर परिसरातील नागरिकांना होणारा त्रास बंद करा असे आदेश विखे पाटील यांनी दिले. नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना संपर्क करून गढूळ पाणी,गलिच्छ पाणी का येते याबाबत अहवाल सादर करण्याचेही आदेश दिले.भाजी मंडई समोर विस्थापित झालेल्या बागवान लोकांना तसेच गांधी पुतळ्याजवळील दुकानदारांना लवकरच दुकाने दिली जातील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
विखे पाटील यांनी स्वतः शहर पिंजून काढण्याचे ठरवले असल्याने शहरातील प्रत्येक प्रभागाचे प्रश्न सुटण्यास मदत होईल अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!