विकासासाठी निधी कमी पडणार नाही-बिहाणी;पालकमंत्री विखे यांच्या साथीने शहराचे चित्र बदलण्याचा विश्वास

श्रीरामपूर-केंद्रात नरेंद्र मोदी, राज्यात देंवेंद्र फडणवीस तर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपचेच असल्याने आपल्याला नगरपालिकेत निधी कमी पडणार नाही....

श्रीरामपूर-
केंद्रात नरेंद्र मोदी, राज्यात देंवेंद्र फडणवीस तर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपचेच असल्याने आपल्याला नगरपालिकेत निधी कमी पडणार नाही. या शहराचे चित्र बदलण्यासाठी आपण भाजपला साथ द्यावी,असे आवाहन नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रीनिवास बिहाणी यांनी केले.

शहरातील विविध प्रभागामध्ये आयोजित प्रचारादरम्यान ते नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी समजून घेत आहेत. प्रभागातील प्रश्न नागरिक त्यांच्यासमोर मांडत आहेत. त्यानंतर नागरिकांच्या प्रश्नाला ते उत्तरे देताना सत्ता आल्यानंतर काय उपाययोजना केल्या जातील याचा लेखाजोखा मांडला जात आहे. बिहाणी म्हणाले, शहरातील विस्थापित अतिक्रमणधारकांचे पुर्नवसन करण्याला आपले प्राधान्या राहील. सध्या शहरातील प्रमुख रस्त्यांवर खड्ड्यांची मालिका तयार झाली आहे. पालकमंत्री विखे पाठीशी असल्याने रस्त्याची कामे करून शहर खड्डेमुक्त केले जाईल. समोर उभे असलेले उमेदवार सत्ताधारी पक्षाचे नसल्याने त्यांना निधी मिळविण्याची अडचण आहे. ते शहराचा विकास कसा करतील हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारावा. एक वर्षात मोठा निधी आताचे लोकप्रतिनिधी आणू शकले नाहीत. तर जे जिल्हा बँकेचे पाच वर्षांपासून संचालक आहेत त्यांनी काय काम केले, असा प्रश्नही बिहाणी यांनी उपस्थित केला.
शहराची पाणीपुरवठा योजना पालकमंत्री विखे यांच्यामुळे मंजूर झाली आहे. शहरातील नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा करण्याला आपले प्राधान्य आहे. आपण उद्योजक असल्याने येथील तरूणांच्या रोजगाराची समस्या माहिती आहेत. त्यादृष्टीने एमआयडीसीमध्ये मोठा प्रकल्प आणण्यासाठी आपले प्रयत्न राहणार आहे. शहरातील काही भागात चोऱ्या, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असून त्यासाठी प्रत्येक रस्त्यावर सीसीटिव्ही बसविले जातील,असे आश्वासन बिहाणी यांनी दिले.यावेळी प्रास्तविक अतुल वढणे यांनी केले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!