विकासासाठी निधी कमी पडणार नाही-बिहाणी;पालकमंत्री विखे यांच्या साथीने शहराचे चित्र बदलण्याचा विश्वास

श्रीरामपूर-केंद्रात नरेंद्र मोदी, राज्यात देंवेंद्र फडणवीस तर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपचेच असल्याने आपल्याला नगरपालिकेत निधी कमी पडणार नाही....

श्रीरामपूर-
केंद्रात नरेंद्र मोदी, राज्यात देंवेंद्र फडणवीस तर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपचेच असल्याने आपल्याला नगरपालिकेत निधी कमी पडणार नाही. या शहराचे चित्र बदलण्यासाठी आपण भाजपला साथ द्यावी,असे आवाहन नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रीनिवास बिहाणी यांनी केले.

शहरातील विविध प्रभागामध्ये आयोजित प्रचारादरम्यान ते नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी समजून घेत आहेत. प्रभागातील प्रश्न नागरिक त्यांच्यासमोर मांडत आहेत. त्यानंतर नागरिकांच्या प्रश्नाला ते उत्तरे देताना सत्ता आल्यानंतर काय उपाययोजना केल्या जातील याचा लेखाजोखा मांडला जात आहे. बिहाणी म्हणाले, शहरातील विस्थापित अतिक्रमणधारकांचे पुर्नवसन करण्याला आपले प्राधान्या राहील. सध्या शहरातील प्रमुख रस्त्यांवर खड्ड्यांची मालिका तयार झाली आहे. पालकमंत्री विखे पाठीशी असल्याने रस्त्याची कामे करून शहर खड्डेमुक्त केले जाईल. समोर उभे असलेले उमेदवार सत्ताधारी पक्षाचे नसल्याने त्यांना निधी मिळविण्याची अडचण आहे. ते शहराचा विकास कसा करतील हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारावा. एक वर्षात मोठा निधी आताचे लोकप्रतिनिधी आणू शकले नाहीत. तर जे जिल्हा बँकेचे पाच वर्षांपासून संचालक आहेत त्यांनी काय काम केले, असा प्रश्नही बिहाणी यांनी उपस्थित केला.
शहराची पाणीपुरवठा योजना पालकमंत्री विखे यांच्यामुळे मंजूर झाली आहे. शहरातील नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा करण्याला आपले प्राधान्य आहे. आपण उद्योजक असल्याने येथील तरूणांच्या रोजगाराची समस्या माहिती आहेत. त्यादृष्टीने एमआयडीसीमध्ये मोठा प्रकल्प आणण्यासाठी आपले प्रयत्न राहणार आहे. शहरातील काही भागात चोऱ्या, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असून त्यासाठी प्रत्येक रस्त्यावर सीसीटिव्ही बसविले जातील,असे आश्वासन बिहाणी यांनी दिले.यावेळी प्रास्तविक अतुल वढणे यांनी केले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!