माझ्यावरचे सर्व आरोप बिनबुडाचे -जिल्हाध्यक्ष दिनकर; पोलिसांत फिर्याद देऊन मानहानीचा दावा दाखल करणार

श्रीरामपूर-
भूमाता महिला ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी माझ्यावर महिलांबाबत केलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे असून मला बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे,असे स्पष्ट करत भाजप चे अहिल्यानगरचे उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

जिल्हाध्यक्ष दिनकर पुढे म्हणाले की, ज्या पदाधिकारी महिलांच्या व्हीडियो बाबत देसाई आरोप करत आहेत तो व्हिडीओ 16 मे 2024 चा म्हणजे 14 महिन्यापूर्वीचा असून माझ्या सोशल नेटवर्किंग आकाउंटवर तो उपलब्ध आहे.माझ्या नातेवाईकांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीचा तो व्हिडीओ आहे.त्यावेळी माझ्या समवेत श्रीरामपूर शहरातील प्रतिष्ठित व्यापारी,उद्योजक व काही राजकीय मंडळी देखील होती.तसेच आपण कुठल्याही महिला पदाधिकारी यांना पदे देण्याच्या आमिषाने कुठेही बोलावलेले नाही.देसाई यांच्याकडे तक्रार करणाऱ्या महिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करावी.हा सर्व माझ्या बदनामीचा प्रकार असून मी स्वतः या विरोधात पोलिसांत जाऊन फिर्याद देणार आहे. तसेच तृप्ती देसाई व संबंधितांविरोधात मानहानीचा दावा दाखल करणार आहे, असे देखील जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी शेवटी सांगितले आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्यावरील देसाई व महिलांच्य या आरोपांनी श्रीरामपूर तालुक्यातील राजकारण पुन्हा एकदा गरम झाले आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News