श्रीरामपूर-
युवकांनी भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे कार्य समाजातील तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचून पक्षवाढीचे काम करावे अशा सूचना मा.खा. डॉ.सुजय विखे पाटील यांनी केल्या.डॉ. विखे पाटील यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन करून पदाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करावी असा मोलाचा सल्लाही दिला.
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा श्रीरामपूर ग्रामीण मंडलाची नवनियुक्ती कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यावेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना विखे पाटील बोलत होते.यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, जिल्हा उपाध्यक्ष दिपक पटारे,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रोहित चौधरी, तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे
युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष महेंद्र पटारे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.नवनियुक्त कार्यकारणीत सरचिटणीस ०४, उपाध्यक्ष्य ०९,चिटणीस ०९,सोशल मिडिया प्रमुख ०२, कोषाध्यक्ष ०१,कार्यकारणी सदस्य यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष महेंद्र पटारे म्हणाले की, भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून येणार्या काळात जनतेचे जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाचा निवडणुकीत युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून भारतीय जनता पक्षाला व महायुतीला घवघवीत यश मिळवुन देण्यासाठीही आपण प्रयत्नशील राहू.सर्व पदाधिकाऱ्यांचे राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेश अध्यक्ष मा.श्री. रविंद्र चव्हाण,जलसंपदा मंत्री ना.डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेश सरचिटणीस विजयराव चौधरी, प्रदेश कार्यालय प्रभारी तथा उत्तर महाराष्ट्र विभाग संघटन मंत्री रवी अनासपूरे, माजी खासदार मा. डॉ.श्री. सुजय विखे पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
