वर्षभरात मी मंजूर केलेल्या विकासकामांचीच उद्घाटने;मा.आ.कानडेंनी साधला आ.ओगले यांच्यावर निशाणा

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जनतेने मला नाकारलं असलं तरी ज्या नुतन लोकप्रतिनिधीला इथल्या जनतेने निवडून दिले त्यांनी आपल्या वर्षभराच्या कार्यकाळात कुठलंच नवीन विकास...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर तालुक्यातील जनतेने मला नाकारलं असलं तरी ज्या नुतन लोकप्रतिनिधीला इथल्या जनतेने निवडून दिले त्यांनी आपल्या वर्षभराच्या कार्यकाळात कुठलंच नवीन विकास काम मंजूर करून आणलेले नाही.माझ्या कार्यकाळात मी मंजूर करून आणलेल्या विकासकामांचीच उद्घाटने करण्याचाच धडाका त्यांनी सुरू ठेवला आहे,अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते,माजी आमदार लहू कानडे यांनी नाव न घेता विद्यमान आमदार हेमंत ओगले यांच्यावर केली.आपल्या यशोधन कार्यालयातील दिवाळी फराळ कार्यक्रमात कानडे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या मनोगततातून विधानसभा निवडणुकीच्या काळात आपल्याशी काँग्रेस पक्ष आणि इथल्या नेतेमंडळींनी कशा प्रकारे दगाफटका केला याचे विवेचन केले.याप्रसंगी माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, सचिन जगताप, अशोक कानडे,अंकुश कानडे, कैलास बोर्डे,राजेंद्र कोकणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.मा.आ. कानडे पुढे म्हणाले की,गेल्या वर्षभरात निवडून आलेले लोकप्रतिनिधी काय काम करतात याकडे मी बारीक लक्ष ठेवून होतो.मी बोलायचंच नाही असे ठरवले होते परंतु आता तालुक्यातील जनतेसाठी मला आजपासून पुन्हा बोलावंच लागणार आहे.श्रीरामपूरच्या विकासात अडथळा आणण्याचे प्रकार जनतेला दिसत आहेत.२०१९ ते २०२४ या कालावधीत आम्ही १३oo कोटी रुपयांचा विक्रमी निधी आपण मतदारसंघात आणला.आणलेला निधी त्याच कामासाठी वापरला गेला. २२o केव्हीए सबस्टेशन, बसस्थानक सुशोभीकरण व रस्त्यांची कामे आपणच मंजूर करून आणली होती. आज त्याच कामांची उद्घाटने नव्या लोकप्रतिनिधीकडून केली जात आहेत.नव्याने कुठलेच काम मंजूर करण्यात आलेले नाही.श्रीरामपूरातील अनेक शासकीय कार्यालयांत आता ‘गमती जमती’ सुरू झाल्या आहेत.त्या मी पाहतोय योग्य वेळ आल्यावर त्यावर बोलणार आहे.
मी निवडून आल्यानंतर माझ एक छोटासा हट्ट होता की मी या तालुक्यातील जनतेचा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलोय मला नेता नाही व्हायचं परंतु किमान आमदार म्हणून तरी मला माझ्या पध्दतीने काम करू द्या.परंतु त्याला प्रस्थापित नेतेमंडळींनी विरोध केला,अशी
टिकाही कानडे यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसच्या करण ससाणे गटावर केली.आपलं नेतृत्व रुजू द्यायचेच नाही हा अनेकांचा हेतू होता.मी ठरवलं असत तर भाजप किंवा शिवसेना अशा कुठल्याही पक्षात जाऊन त्यांचे तिकीट मिळवू शकलो असतो,परंतु आपण तसे केले नाही.अखेरीस काँग्रेस पक्षाने ज्या पाच विद्यमान आमदारांची तिकिटे कापली त्यात आपलाही समावेश झाला.तरीही येणाऱ्या काळात मी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेसाठी पूर्ण वेळ उपलब्ध असणार आहे.
शेवटच्या श्वासापर्यंत इथल्या जनतेची सेवा करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा योग्य सन्मान राखला गेला नाही तर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर नगरपालिका,जि. प.व पंचायत समितीच्या निवडणूका स्वबळावर लढवल्या जातील,असेही कानडे शेवटी म्हणाले.

यशोधन कार्यालयात आयोजित दिवाळी फराळ कार्यक्रमात बोलताना मा. आ. लहुजी कानडे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!