श्रीरामपूर (प्रतिनिधी) – श्रीरामपूर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईचे संकट गडद झाले असताना, भाजपच्या सक्रिय पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीरामपूरला तात्काळ पाणी सोडण्याचे स्पष्ट आदेश जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावामध्ये सध्या केवळ एक दिवसपुरेल एवढा पाणीसाठा उरला असून, यामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण होते. वाढत्या उष्णतेमुळे व पावसाअभावी तलावातील जलसाठा कमी होत गेला असून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे.
ही स्थिती लक्षात घेता, भाजपच्या शिष्टमंडळाने मुंबईतील रॉयलस्टोन निवासस्थानी जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन श्रीरामपूरसाठी तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्याची विनंती केली. या शिष्टमंडळात भाजपा अहिल्यानगर उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, जिल्हा उपाध्यक्ष सतीश सौदागर, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष बंडूकुमार शिंदे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. या मागणीची गांभीर्याने दखल घेत नामदार विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांच्याशी थेट संपर्क साधून श्रीरामपूरला तत्काळ पाणी सोडण्याचे स्पष्ट आदेश दिले. त्यांच्या या तातडीच्या निर्णयामुळे श्रीरामपूरकर नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या शिष्टमंडळाने वेळेवर केलेली ही भेट अत्यंत परिणामकारक ठरल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात असून, जनतेच्या मूलभूत गरजांकडे शासनाचे लक्ष वेधून तातडीने कृती घडवून आणण्यात भाजप यशस्वी ठरल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. शहरामध्ये मागील काही आठवड्यांपासून होत असलेल्या अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण होते. तलावातील जलसाठा संपत चालल्याने संभाव्य आरोग्यविषयक आणि नागरी अडचणी लक्षात घेता भाजपने हा पुढाकार घेतल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. नागरिकांच्या मुलभूत गरजांकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी शासन दरबारी एकसंघ स्वरूपात पाठपुरावा करण्यात आला, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या निर्णयामुळे तात्पुरत्या स्वरूपात का होईना, श्रीरामपूर शहरातील पाणीटंचाईच्या समस्येवर काही प्रमाणात तोडगा निघाला असून, यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. मात्र, ही समस्या फक्त तात्पुरत्या उपायांनी सुटणार नसून, भविष्यातील गंभीर पाणीटंचाई टाळण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना राबवण्याची गरज अधिक तीव्रतेने अधोरेखित झाली आहे. शासन व स्थानिक प्रशासन यांच्यातील समन्वयातून आगामी काळात स्थायी स्वरूपाचा पाणीपुरवठा आराखडा तयार करणे ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट होत आहे.
भाजपच्या प्रयत्नांना यश; जलसंपदा मंत्र्यांकडून श्रीरामपूरला तात्काळ पाणीपुरवठ्याचे आदेश
श्रीरामपूर (प्रतिनिधी) – श्रीरामपूर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईचे संकट गडद झाले असताना, भाजपच्या सक्रिय पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून...
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223
संबंधित बातम्या
सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड
श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन
‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान
श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या
कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा
श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस
शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल
श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान
श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या
खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी
श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी
Latest News
Trending News