आता उडणार धुरळा;श्रीरामपूरातील गट व गणांचे आरक्षण जाहीर;नव्या राजकीय समीकरणांची नांदी

श्रीरामपूर-जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या होऊ घातलेल्यानिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर तालुक्यातील चार गट व आठ गणांचे आरक्षण व लोकसंख्या विवरणपत्र जाहीर झाले...

श्रीरामपूर-
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर तालुक्यातील चार गट व आठ गणांचे आरक्षण व लोकसंख्या विवरणपत्र जाहीर झाले आहे.गावगाड्याच्या राजकारणावर प्रभुत्व गाजवण्याची इर्षेने सर्वपक्षीय राजकीय धुरंधरांमध्ये आता धुरळा उडणार हे जवळपास निश्चित झाले आहे. नवीन आरक्षण सोडतीमुळे तालुक्यातील ग्रामीण भागाच्या राजकारणात नवी राजकीय समीकरणे दिसून आल्यास नवल वाटू नये.
तालुक्याची एकूण लोकसंख्या १ लाख ९८ हजार २१८ असून, त्यापैकी अनुसूचित जातींची लोकसंख्या ३८ हजार ७७४ (१९.५६ टक्के) व अनुसूचित जमातींची लोकसंख्या १७ हजार ५८३ (८.८७ टक्के) आहे. या आधारे आठ गणांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.निमगाव खैरी गण (क्र. ५१) – सर्वसाधारण (जनरल)-या गणात ११ ग्रामपंचायतींचा समावेश असून लोकसंख्या २३,८०९ आहे.हा गण सर्वसाधारण वर्गासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.उंदीरगाव गण (क्र. ५२) – अनुसूचित जाती- ८ ग्रामपंचायतींचा समावेश असलेल्या या गणाची लोकसंख्या २५,८५६ इतकी आहे.
टाकळीभान गण (क्र. ५३) – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला-या गणात ४ ग्रामपंचायती आहेत. लोकसंख्या २६,२२४ असून मागास प्रवर्गातील महिलेसाठी हा गण राखीव आहे.निपाणी-वडगाव गण (क्र. ५४) – सर्वसाधारण महिला-या गणाची लोकसंख्या २२,९१४ असून हा गण सर्वसाधारण महिलांसाठी राखीव करण्यात झाला आहे.दत्तनगर गण (क्र. ५५) – अनुसूचित जाती महिला-५ ग्रामपंचायती असलेल्या या गणात लोकसंख्या २४,२५३ आहे.अनुसूचित जातीतील महिलांना स्थानिक स्वराज्यात संधी देण्यासाठी हे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. हा तालुक्यातील सर्वाधिक अनुसूचित जाती लोकसंख्या असलेला गण ठरला आहे.उक्कलगाव गण (क्र. ५६) – नागरिकांचा मागास प्रवर्ग-८ ग्रामपंचायती व ९ गावे असलेल्या या गणात लोकसंख्या २४,०४६ असून हा गण मागास प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
बेलापूर बु. गण (क्र. ५७) – सर्वसाधारण महिला-
३ ग्रामपंचायती व ५ गावे या गणात आहेत. लोकसंख्या २४,७४९ असून या भागात महिलांचे शैक्षणिक प्रमाण जास्त असल्याने निवडणुकीत महिला उमेदवारांमध्ये तीव्र चुरस अपेक्षित आहे.पढेगाव गण (क्र. ५८) – अनुसूचित जमाती-१० ग्रामपंचायती असलेल्या या गणाची लोकसंख्या २६,३६७ असून हा तालुक्यातील सर्वाधिक अनुसूचित जमाती लोकसंख्या असलेला गण आहे.
या वितरणावरून दोन गण अनुसूचित जातींसाठी, एक गण अनुसूचित जमातींसाठी, दोन गण मागास प्रवर्गासाठी आणि तीन गण सर्वसाधारण वर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.श्रीरामपूर तालुक्यात जिल्हा परिषदेचे चार गट आहेत.या गटाचे आरक्षण पुढीलप्रमाणे-
दत्तनगर – अनुसूचित जाती पुरुष
उंदीरगाव – अनुसूचित जाती महिला,
बेलापूर – अनुसूचित जाती महिला,
टाकळीभान – सर्वसाधारण महिला.
या आरक्षणामुळे श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामीण भागात राजकीय हालचालींना वेग येणार आहे. विविध पक्षांनी गणनिहाय उमेदवारांची छाननी सुरू केली असून, काही ठिकाणी स्थानिक गटबाजी डोके वर काढताना दिसणार आहे.दरम्यान, या घोषणेमुळे श्रीरामपूर तालुक्यातील निवडणूक वातावरण तापणार असून तालुक्यातील ग्रामीण भागाचे राजकारण चांगलेच ढवळून निघणार आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!