श्रीरामपूरात भाजपसाठी योगदान नसलेल्यांनाच महत्व;जलसंपदा मंत्री महाजन यांच्याकडे शिष्टमंडळाने व्यक्त केली खदखद

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यात भाजप पक्षासाठी काम करणाऱ्यांपेक्षा पक्षाला कोणतेही योगदान नसलेल्या व्यक्तींना महत्त्व दिले जात आहे.तर दुसरीकडे प्रकाश चित्ते यांच्यावर सातत्याने अन्याय...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर तालुक्यात भाजप पक्षासाठी काम करणाऱ्यांपेक्षा पक्षाला कोणतेही योगदान नसलेल्या व्यक्तींना महत्त्व दिले जात आहे.तर दुसरीकडे प्रकाश चित्ते यांच्यावर सातत्याने अन्याय होत आहे.त्यामुळे श्रीरामपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक  
आम्ही कुठल्याही परिस्थितीत लढवणार आहोत,अशी भूमिका श्रीरामपूर येथील भाजपच्या शिष्टमंडळाने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मांडली.मुंबई येथे सेवासदन बंगल्यावर भाजप मधील विविध कार्यकर्त्यांसमवेत प्रकाश चित्ते यांनी ना.गिरीश महाजन यांची भेट घेतली.यावेळी चर्चेनंतर ना.गिरीश महाजन यांनी ‘काळजी करू नका, सर्व ठीक होईल’ असे आश्वासन या शिष्टमंडळाला दिली असल्याची माहिती चित्ते यांनी दिली.याप्रसंगी भाजप नेते सुनील मुथ्या, माजी शहराध्यक्ष राजेंद्र कांबळे, माजी तालुकाध्यक्ष बबन मुठे, सुरेश आसने आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
या भेटीवेळी झालेल्या चर्चेत श्रीरामपूर तालुक्यात भारतीय जनता पक्षासाठी गेली 35 वर्षे प्रतिकूल परिस्थितीतही झटत काम केलेल्या कार्यकर्त्यांच्या समस्यांबाबत सविस्तर चर्चा झाली.शिर्डी संस्थानच्या विश्वस्तपदापासून, जिल्हाध्यक्षपदापर्यंत अगदी जिल्हा नियोजन मंडळाच्या सदस्यपदापर्यंतही चित्ते यांना अन्याय सहन करावा लागत आहे,असे यावेळी शिष्टमंडळाने ना. महाजन यांना सांगितले. याशिवाय, महाराष्ट्रात विधानसभेच्या वेळी पक्षाच्या विरोधात उमेदवारी  केलेल्या कार्यकर्त्यांवर कारवाई न होता. श्रीरामपूर तालुक्यात भाजपचा उमेदवार नसतानाही केवळ नामदार राधाकृष्ण विखे पा. यांच्या सांगण्यावरून प्रकाश चित्ते यांना पक्षातून काढण्यात आले.तसेच अलीकडेच श्रीरामपूरमध्ये काँग्रेसमधील दहा नगरसेवकांना पक्षात घेतले गेले आहे. त्यांना नगराध्यक्षपदाचा शब्द देण्यात आला असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!