आ.ओगले यांनी ‘फुकटचं श्रेय’ घेऊ नये-त्रिभुवन;सर्वपक्षीय आंदोलनांमुळे श्रीरामपूर-मुंबई बस सुरू

श्रीरामपूर-गेली सहा वर्षांपासून बंद असलेली श्रीरामपूर-मुंबई एसटी बस अखेर आज (६ ऑक्टोबर) रात्री ८.३० वाजता पुन्हा सुरू झाली. या ऐतिहासिक निर्णयामागे...

श्रीरामपूर-
गेली सहा वर्षांपासून बंद असलेली श्रीरामपूर-मुंबई एसटी बस अखेर आज (६ ऑक्टोबर) रात्री ८.३० वाजता पुन्हा सुरू झाली. या ऐतिहासिक निर्णयामागे गेली सहा महिन्यापासून सर्वपक्षीय आंदोलनाचा पाठपुरावा असून, हे यश आंदोलनकर्त्यांचं आहे. मात्र, या बस सुरू होण्याचे श्रेय आमदार हेमंत ओगले यांनी घ्यायचा केलेला प्रयत्न “फुकटचा आणि केविलवाणा” असल्याची टीका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी केली आहे.सहा महिन्याच्या संघर्षानंतर यश श्रीरामपूर-मुंबई बस गेली सहा वर्षे बंद होती. ती पुन्हा सुरू व्हावी यासाठी आम्ही सातत्याने आंदोलन, निवेदने आणि पाठपुरावा केला. शेवटी आगार प्रमुख अनिल बेहेरे यांनी आमच्या आंदोलनाची दखल घेत पंधरा दिवसापूर्वी लेखी आश्वासन दिलं आणि बस सुरू झाली. यामध्ये आमदार हेमंत ओगले यांचा कोणताही सहभाग नव्हता. साधे दोन ओळीचे पत्र देखील दिले नाही परंतु गाडी सुरू होणार हे कळताच आमदार ओगले आणि त्यांचे काही कार्यकर्ते अचानक प्रकट झाले आणि नारळ फोडून फोटोसेशन करून निघून गेले. त्यानंतर सोशल मीडियावर, विशेषतः व्हॉट्सअ‍ॅपवर, ही बस त्यांच्या प्रयत्नामुळे सुरू झाल्याचे खोटे संदेश पसरवण्यात आले. हे जनतेची दिशाभूल करणारे असून अशा खोट्या श्रेय लाटण्याचा आम्ही तीव्र निषेध करतो त्यांना श्रेय घ्यायच असेल तर रोज सकाळी आठ वाजता श्रीरामपूर मुंबई बस चालू होती ती बस कोरोना काळापासून बंद केली आहे ती गाडी पुन्हा सुरू करून दाखवावे आणि त्याचे श्रेय आ.ओगलेंनी घ्यावे त्यांचा आम्ही जाहीर सत्कार करू असेही त्रिभुवन यांनी स्पष्ट केले.श्रीरामपूर आगाराला मिळालेल्या १० नवीन एसटी बसबाबतही स्पष्टीकरण देताना मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये म्हणाले,की गाड्या आमदार ओगले यांच्या प्रयत्नाने मिळालेल्या नाहीत.तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशानुसार राज्यातील प्रत्येक आगाराला न मागता १० बस देण्यात आल्या आहेत. अजूनही दोन टप्प्यांत प्रत्येकी ५ अशा १० बस येणार आहेत.कारण जुन्या अनेक गाड्या स्क्रॅप करण्यात आल्या आहेत.
माजी नगरसेवक मुख्तार शहा यांनीही हेमंत ओगले यांच्यावर टीका करताना म्हणाले, “जर यापुढे आमदारांनी अशाप्रकारे खोटं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला, तर तो प्रकार खपवून घेतला जाणार नाही.”आम्ही आंदोलन करून मिळवलेलं यश कुणी हायजॅक करणार असेल, तर त्याचा निषेध होणारच. माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे,विभागीय जिल्हाप्रमुख भीमराज बागुल म्हणाले की मतदारसंघात अनेक कामे प्रलंबित आहेत त्या कामाकडे त्यांनी लक्ष केंद्रित करावे. सुभाष त्रिभुवन यांनी केलेले कामात ढवळाढवळ करू नये अन्यथा रिपाई स्टाईलने उत्तर दिले जाईल.यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे, गुरुनानक मार्केटचे बिट्टू शेठ बत्रा, बन्सीलाल फेरवानी, संदीप पवार, रोशन बात्रा, दीपक माखिजा, अहमद शहा आदी उपस्थित होते.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!