आ.ओगले यांनी ‘फुकटचं श्रेय’ घेऊ नये-त्रिभुवन;सर्वपक्षीय आंदोलनांमुळे श्रीरामपूर-मुंबई बस सुरू

श्रीरामपूर-गेली सहा वर्षांपासून बंद असलेली श्रीरामपूर-मुंबई एसटी बस अखेर आज (६ ऑक्टोबर) रात्री ८.३० वाजता पुन्हा सुरू झाली. या ऐतिहासिक निर्णयामागे...

श्रीरामपूर-
गेली सहा वर्षांपासून बंद असलेली श्रीरामपूर-मुंबई एसटी बस अखेर आज (६ ऑक्टोबर) रात्री ८.३० वाजता पुन्हा सुरू झाली. या ऐतिहासिक निर्णयामागे गेली सहा महिन्यापासून सर्वपक्षीय आंदोलनाचा पाठपुरावा असून, हे यश आंदोलनकर्त्यांचं आहे. मात्र, या बस सुरू होण्याचे श्रेय आमदार हेमंत ओगले यांनी घ्यायचा केलेला प्रयत्न “फुकटचा आणि केविलवाणा” असल्याची टीका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी केली आहे.सहा महिन्याच्या संघर्षानंतर यश श्रीरामपूर-मुंबई बस गेली सहा वर्षे बंद होती. ती पुन्हा सुरू व्हावी यासाठी आम्ही सातत्याने आंदोलन, निवेदने आणि पाठपुरावा केला. शेवटी आगार प्रमुख अनिल बेहेरे यांनी आमच्या आंदोलनाची दखल घेत पंधरा दिवसापूर्वी लेखी आश्वासन दिलं आणि बस सुरू झाली. यामध्ये आमदार हेमंत ओगले यांचा कोणताही सहभाग नव्हता. साधे दोन ओळीचे पत्र देखील दिले नाही परंतु गाडी सुरू होणार हे कळताच आमदार ओगले आणि त्यांचे काही कार्यकर्ते अचानक प्रकट झाले आणि नारळ फोडून फोटोसेशन करून निघून गेले. त्यानंतर सोशल मीडियावर, विशेषतः व्हॉट्सअ‍ॅपवर, ही बस त्यांच्या प्रयत्नामुळे सुरू झाल्याचे खोटे संदेश पसरवण्यात आले. हे जनतेची दिशाभूल करणारे असून अशा खोट्या श्रेय लाटण्याचा आम्ही तीव्र निषेध करतो त्यांना श्रेय घ्यायच असेल तर रोज सकाळी आठ वाजता श्रीरामपूर मुंबई बस चालू होती ती बस कोरोना काळापासून बंद केली आहे ती गाडी पुन्हा सुरू करून दाखवावे आणि त्याचे श्रेय आ.ओगलेंनी घ्यावे त्यांचा आम्ही जाहीर सत्कार करू असेही त्रिभुवन यांनी स्पष्ट केले.श्रीरामपूर आगाराला मिळालेल्या १० नवीन एसटी बसबाबतही स्पष्टीकरण देताना मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये म्हणाले,की गाड्या आमदार ओगले यांच्या प्रयत्नाने मिळालेल्या नाहीत.तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशानुसार राज्यातील प्रत्येक आगाराला न मागता १० बस देण्यात आल्या आहेत. अजूनही दोन टप्प्यांत प्रत्येकी ५ अशा १० बस येणार आहेत.कारण जुन्या अनेक गाड्या स्क्रॅप करण्यात आल्या आहेत.
माजी नगरसेवक मुख्तार शहा यांनीही हेमंत ओगले यांच्यावर टीका करताना म्हणाले, “जर यापुढे आमदारांनी अशाप्रकारे खोटं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला, तर तो प्रकार खपवून घेतला जाणार नाही.”आम्ही आंदोलन करून मिळवलेलं यश कुणी हायजॅक करणार असेल, तर त्याचा निषेध होणारच. माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे,विभागीय जिल्हाप्रमुख भीमराज बागुल म्हणाले की मतदारसंघात अनेक कामे प्रलंबित आहेत त्या कामाकडे त्यांनी लक्ष केंद्रित करावे. सुभाष त्रिभुवन यांनी केलेले कामात ढवळाढवळ करू नये अन्यथा रिपाई स्टाईलने उत्तर दिले जाईल.यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे, गुरुनानक मार्केटचे बिट्टू शेठ बत्रा, बन्सीलाल फेरवानी, संदीप पवार, रोशन बात्रा, दीपक माखिजा, अहमद शहा आदी उपस्थित होते.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!