श्रीरामपूर-
तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात गेल्या महिन्यापासून वीज पुरवठा वांरवार खंडित होत आहे. थोडासा पाऊस झाला तरी वीज पुरवठा खंडित होतो. ग्रामीण व शहरी भागतील शेती व घरगुती वापरातील वीज पुरवठा अखंडितपणे सुरळीत करावा, याकरिता लोकनेते माजी आ. भानुदास मुरकुटे, माजी खा. सदाशिव लोखंडे व माजी आ. भाऊसाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शिवसेनेच्यावतीने महावितरण विभागाच्या कार्यकारी अभियंता अजय भंगाळे यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, श्रीरामपूर तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात गेल्या महिन्यापासून अनेक वेळा सकाळी व सायंकाळी दोन तास वीज पुरवठा खंडित होत आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. तात्काळ शहरी व ग्रामीण भागातील शेती व घरगुती वापरातील वीज पुरवठा अखंडितपणे सुरळीत करावे.या निवेदनाचा गांभीर्यपूर्वक विचार होऊन महावितरण कंपनीने त्वरीत अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा याप्रश्नी लोकनेते माजी आ. भानुदास मुरकुटे, माजी खा. सदाशिव लोखंडे व माजी आ. भाऊसाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे.निवेदन देताना मुळा प्रवराचे संचालक सिद्धार्थ मुरकुटे, माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे, शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रदिप वाघ, माजी जिल्हा प्रमुख राजेंद्र देवकर, अशोक कारखान्याचे संचालक निरज मुरकुटे, युवासेना जिल्हा प्रमुख शुभम वाघ, तालुका प्रमुख उमेश पवार, नाना पाटील, विशाल धनवटे, गणेश छल्लारे, राहुल भंडारी, विक्रम नाईक, कैलास भागवत, चांगदेव जाधव, अशोक जाधव, अंश शिरसाळे आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
