श्रीरामपूर-
दरवर्षी शिष्यवृत्ती परिक्षेस हजारो विद्यार्थी बसत असतात. त्यातील ठराविक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते. मात्र प्रशासनाकडून सरसकट सर्वच विद्यार्थ्यांना नवीन बँकखाते उघडण्याची सक्ती करण्यात येते. या प्रक्रियेत पालक व विद्यार्थ्यांची मोठी हेळसांड होते. त्यामुळे शालेय कामकाजासाठी पालकांचे बँक खाते ग्राह्य धरावे, अशी मागणी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांनी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे मागणी
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील सर्व शाळेत मुलांना बैंकेत खाते उघडणे बंधनकारक करण्यात आले आहे, त्या खात्यासाठी फोननंबर देणे आवशक असते, पालकांच्या नंबरवरएक पेक्षा अधिक अकाऊंट झाल्यास बैकेचे मेसेज येणं बंद होत , तसेच मुलांचा अकाऊंट वर कधीही पैसे येत नाही , ट्रांजक्षण न झाल्याने खात्यास दंड पडतो, हे निष्कारण असलेले खाते उघडणे बंधनकारक न करता पालकांचे खाते त्यासाठी ग्राह्य धरण्यात यावे, पालकांची हेळसांड थांबवावी. अन्यथा छावा संघटनेच्या स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर नितीन पटारे पाटील (जिल्हा अध्यक्ष छावा), प्रवीण देवकर (जिल्हा उपाध्यक्ष), शरद बोंबले पाटील (शहर अध्यक्ष श्रीरामपूर) भागवत बोंबले पाटील आदींची नावे आहेत.
