श्रीरामपूर-
अतिवृष्टीच्या या अस्मानी संकटात तुम्ही एकटे नसून आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत, असा धीर आमदार हेमंत ओगले यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बांधावर जाऊन दिला.गेल्या काही दिवसांमध्ये श्रीरामपूर राहुरी विधानसभा मतदारसंघात ढगफुटीसदृश्य पाऊस पडला या पावसात अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले सदर झालेल्या नुकसानीचे प्रत्यक्ष बांधावर जात आ.ओगले यांनी पाहणी केली.यावेळी जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबासाहेब दिघे, पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे, उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले व पदाधिकारी उपस्थित होते.करण ससाणे म्हणाले की, अतिवृष्टी होताच आ. ओगले यांनी तातडीने सरसकट पंचनामा करण्याचे आदेश सरकारी यंत्रणेला दिले असून तातडीने शेतकऱ्यांना मदत मिळवून देणे कमी आ.ओगले प्रयत्नशील असल्याचे म्हटले.सचिन गुजर म्हणाले की, शेतकरी चहूबाजूंनी अडचणी सापडला आहे आता तोंडाशी आलेले पीक नजरेसमोर पाण्यात सडत असल्याने बळीराजा हवालदिल झाला असल्याचे सांगितले.बाबासाहेब दिघे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची की तातडीने भरपाई देण्याची मागणी केली.डॉ. मुरकुटे म्हणाल्या की, निसर्गाचा लहरीपणा, कवडीमोल बाजारभाव अशा दुहेरी संकटात शेतकरी असून येणाऱ्या काळात बळीराजाला साथ देणे महत्त्वाचे आहे.
