अज्ञात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड;श्रीरामपूर शहरात दहशत माजवण्याचा प्रकार

श्रीरामपूर-शहरातील भगतसिंग चौक परिसरात रविवारी (दि.१७ सप्टेंबर) पहाटेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांच्या टोळक्याने वाहनांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.परिसरात घरासमोर उभ्या...

श्रीरामपूर-
शहरातील भगतसिंग चौक परिसरात रविवारी (दि.१७ सप्टेंबर) पहाटेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांच्या टोळक्याने वाहनांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.परिसरात घरासमोर उभ्या असलेल्या आठ वाहनांचे या टोळक्याने नुकसान केले.श्रीरामपूरात गेल्या काही दिवसांपासून धुमसत असलेल्या टोळीयुध्दाशी या घटनेचा संबंध असल्याची नागरिकांत चर्चा सुरू आहे.शहरात गुन्हेगारी घटनांची मालिकाच सुरू झाली असल्याने गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला आहे की नाही? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकाला पडला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,पहाटे दोनच्या सुमारास सुमारे ८ ते १० जणांचा टोळक्याने धारदार शस्त्रांसह भगतसिंग चौक परिसरातील गाड्यांवर दगडफेक करत तीनचाकी व चारचाकी वाहनांची तोडफोड केली. काही गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या तर काही वाहनांचे नुकसान करण्यात आले. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेचा संबंध नुकत्याच झालेल्या टोळीयुद्धाशी जोडला जात असून घटनेतील काही आरोपींच्या घराजवळच वाहनांची तोडफोड झाली आहे. पोलीस मदत केंद्राजवळ घडलेल्या या घटनेने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते आहे.घटना घडल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात येत असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. सदर गुन्ह्यात सहभागी असलेल्यांना लवकरच गजाआड केले जाईल. कोणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही, असे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी सांगितले आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!