श्रीरामपूर-
श्रीरामपूर- राहुरी विधानसभा मतदारसंघात गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये अति मुसळधार पाऊस झाला असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतीपिकांचे नुकसान झाले आहे सदर नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश श्रीरामपूर व राहुरी तहसीलदारांना दिले असल्याची माहिती आमदार हेमंत ओगले यांनी दिली आहे.
श्रीरामपूर व राहुरी तालुक्यातील काही मंडळात अतिवृष्टी तर काही ठिकाणी दमदार पाऊस झाला आहे त्यामध्ये शेती पिकासह काही ठिकाणी राहत्या घरांची देखील नुकसान झाले आहे सदर नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले असून सदरचे पंचनामे होताच जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तातडीने शासनाकडे प्रस्ताव पाठवून जास्तीत जास्त मदत कशी मिळवून देता येईल यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आमदार ओगले यांनी सांगितले.श्रीरामपूर व राहुरी तालुक्यात झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन व कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले असून झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना राहुरी व श्रीरामपूर येथील तहसीलदारांना दिल्या आहेत. याबाबत काही अडचण आल्यास मला अथवा जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन आ. ओगले यांनी केले आहे.

दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे श्रीरामपूर शहरात देखील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते पालिकेने मान्सूनपूर्व केलेल्या नालेसफाईवर आमदार हेमंत ओगले यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांना तातडीने नालेसफाई करण्याचे आदेश देताच पालिकेने सफाई चे काम चालू केले आहे.