‘अशोकलाच ऊस द्या’ म्हणण्याची वेळ तुमच्यावर का आली?;शेतकरी संघटनेचे भोसले यांचा सवाल

श्रीरामपूर-गेली चाळीस वर्षे अशोक कारखाना ताब्यात असणाऱ्या माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी कारखाना आर्थिक डबघाईस आणला.आजमितीला कारखान्यावर ४५० कोटीचे कर्ज करुन ठेवले...

श्रीरामपूर-
गेली चाळीस वर्षे अशोक कारखाना ताब्यात असणाऱ्या माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी कारखाना आर्थिक डबघाईस आणला.आजमितीला कारखान्यावर ४५० कोटीचे कर्ज करुन ठेवले आहे.सातत्याने कमी भाव मिळत असल्याने सभासद,ऊसउत्पादक अशोक कारखान्याकडे पाठ फिरवू  लागले आहेत.आज ‘अशोकलाच ऊस द्या’ असे म्हणण्याची वेळ तुमच्यावर का आली? याचे आत्मपरिक्षण करा,असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जितेन्द्र भोसले यांनी केले आहे.प्रसिध्दीस दिलेल्या पञकात श्री.भोसले यांनी माजी.आ.मुरकुटे यांच्या अशोक कारखान्याला ऊस देवून कामधेनु वाचवावी या आवाहनाची खिल्ली उडविली.ते पुढे म्हणाले की, अशोक कारखान्याच्या व्यवस्थापनाने गणेश कारखान्याचा आदर्श घेवून मागील हंगामाचे प्रतिटन ३०० रुपये व सन २३-२४ हंगामाचे २०० रु. असे ५०० रुपये पेमेंट दस-यापूर्वी अदा करावे.कामगार हे सभासद अथवा सभासदांची मुले आहेत तेव्हा  कामगार व निवृत्त कामगारांचे थकीत देणे अदा करावे.कामगारांच्या नावावर घेतलेले कर्ज निल करावे.अन्यथा दस-यानंतर सभासद व कामगारांच्या पोटातील आग मस्तकात गेल्यास नेपाळमध्ये झाली तशी परिस्थिती कारखान्यावर होईल असा इशाराही श्री.भोसले यांनी दिला आहे.सभासद ऊस ऊत्पादकांना गणेश कारखान्यापेक्षाही कमी भाव घ्यावा लागतो आहे.कामगारांना आठ महिन्यांचे वेतन, निवृत्त कामगारांच्या ग्रॅज्युइटीच्या रकमाही थकीत आहेत.कामगारांच्या नावावर कर्ज काढून कारखाण्याचा खर्च भागविण्याची वेळ आली.या सर्व स्थितीमुळे अशोकरुपी कामधेनुची माजी आ.मुरकुटे यांनी खाटी गाय केली आहे.सी.ए.चेअरमन व सर्वेसर्वा असलेला अशोक कारखाना गणेश इतकाही भाव देत नाही.गणेश कारखान्याने १९८८पासूनचे कामगारांचे देणे चुकते केले. तर “अशोक”च्या व्यवस्थापनाने कामगारांचे वेतन थकविले.२५ टक्के पगार कपात सुरु केली.कोट्यावधीचे ऊस तोडणी मजूर, वाहतुकदार,व्यापारी देणेही थकविले.अनावश्यक गाळप,डिस्टीलरी,इथेनाॕल प्रकल्पांची क्षमतावाढ  करुन कारखाना ४५० कोटी इतका कर्जबाजारी करुन ठेवला.आता परत ९०० टनाची गाळप क्षमतावाढ प्रस्तावित केली आहे.गेली ३० वर्षे विखे – थोरातांना शिव्या देऊन सभासदांच्या डोळ्यात धूळफेक केली. दारुचे कारखानदार जास्त दर देऊ शकतात मग आपल्याकडेही देशी दारू वगळता सर्व प्रकल्प आहेत. मग कबूल करूनही भाव का देऊ शकत नाही याचे उत्तर मुरकुटे यांनी दिले पाहिजे. प्रकल्पासाठी व विस्तारीकरणासाठी कपात केली नाही असे म्हणता मग ३००/४०० रुपये भाव कमी देऊन अप्रत्यक्षपणे ऊस बिलातुन कपात केली नाही का? शैक्षणिक संस्थांसाठी सभासदांकडून एक रुपयाही घेतला नाही म्हणणाऱ्या मुरकुटे यांनी सभासदांच्या ऊस बिलातून कपात केलेल्या भागविकास निधीचे काय केले? या प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे.सध्या माजी.आ.मुरकुटे यांनी गावोगावी जाऊन जलपूजन करण्याचा धडाका लावला आहे.यात केवळ नातवाला प्रोजेक्ट करायचा हेतू आहे.श्री.मुरकुटे गेली २५ वर्षे आमदार नाहित.तरी पाटपाण्याची अडचण भासली नाही.यावरुन श्री.मुरकुटे यांनी पाटपाण्याचा केवळ राजकीय बागूलबुवा उभा केला होता हे सिध्द होते.स्व.गोविंदराव आदिक पाटबंधारे मंञी असताना खानापूर व भेर्डापूरचे के.टी.वेअर झाले.त्यानंतर स्व.दौलतराव पवारांनी पाणी प्रश्न धसास लावला.भांडारदराचे पाणी वाटप करुन तालुक्याला ५२ टक्के शाश्वत पाणी मिळवून दिले.ज्या स्व.जयंत ससाणे यांच्या आमदारकीच्या काळात समन्यायी पाणी वाटपाचा काळा कायदा झाला असे म्हणत श्री.मुरकुटे खडे फोडायचे त्यांच्या गटाशीच सत्तेसाठी नंतर हातमिळवणी केली.ज्या माजी आ.भाऊसाहेब कांंबळे यांच्या काळात ब्लाॕक रद्द झाले.त्यांच्याच मांडीला मांडी लावून आता बसत आहेत.अन्याय सहन करणाऱ्या सभासद, ऊसउत्पादक व कामगारांनी आता अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सज्ज व्हावे असे आवाहनही श्री. भोसले यांनी केले आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!