श्रीरामपूर–मुंबई बससेवा सुरू होणार;सर्वपक्षीय आंदोलकांना एसटी प्रशासनाचे आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर – मुंबई एसटी बस सेवा तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी आज एसटी आगार श्रीरामपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर – मुंबई एसटी बस सेवा तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी आज एसटी आगार श्रीरामपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय निदर्शने करण्यात आली. या आंदोलनाची दखल घेत एसटी आगार प्रमुख अनिल बेहेरे यांनी 6 ऑक्टोबरपासून बस सेवा सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले.
या आंदोलनात भाजपाचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, रिपाईचे जिल्हा संघटक राजू नाना गायकवाड यांच्यासह विविध पक्षांचे आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी बोलताना सुभाष त्रिभुवन म्हणाले,
महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईसाठी श्रीरामपूरहून थेट बस सेवा उपलब्ध नसणे ही खेदजनक आणि संतापजनक बाब आहे. कोरोना काळापासून ही सेवा बंद असल्यामुळे व्यापारी, महिला, वृद्ध व प्रवासी वर्गाला प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत होते. गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या निवेदन व आंदोलनाच्या लढ्याला आज यश मिळाले. ही एकजुटीची ताकद असून, जनता आणि विविध पक्षांच्या पाठबळामुळे हे शक्य झाले आहे.या आंदोलनात लहुजी शक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष लहू खंडागळे, भीमशक्तीचे जिल्हा उपाध्यक्ष अल्ताफ शेख, मर्चंट असोसिएशनचे सदस्य योगेश ओझा, शरीफ शेख, आसिफ मणियार राकेश थोरात, किशोर ओझा असलम आत्तार कैलास बाविस्कर गणेश पालकर गणेश कुवर प्रदीप निकम यांचाही सक्रीय सहभाग होता.तसेच, यावेळी एसटी वाहतूक निरीक्षक अनिल पठारे, वरिष्ठ लिपिक राकेश सोनवणे आदी एसटी विभागाचे अधिकारीही उपस्थित होते.6 ऑक्टोबरपासून सुरू होणारी श्रीरामपूर – मुंबई एसटी बस सेवा प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार असून, या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!