श्रीरामपूर–मुंबई बससेवा सुरू होणार;सर्वपक्षीय आंदोलकांना एसटी प्रशासनाचे आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर – मुंबई एसटी बस सेवा तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी आज एसटी आगार श्रीरामपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर – मुंबई एसटी बस सेवा तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी आज एसटी आगार श्रीरामपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय निदर्शने करण्यात आली. या आंदोलनाची दखल घेत एसटी आगार प्रमुख अनिल बेहेरे यांनी 6 ऑक्टोबरपासून बस सेवा सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले.
या आंदोलनात भाजपाचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, रिपाईचे जिल्हा संघटक राजू नाना गायकवाड यांच्यासह विविध पक्षांचे आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी बोलताना सुभाष त्रिभुवन म्हणाले,
महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईसाठी श्रीरामपूरहून थेट बस सेवा उपलब्ध नसणे ही खेदजनक आणि संतापजनक बाब आहे. कोरोना काळापासून ही सेवा बंद असल्यामुळे व्यापारी, महिला, वृद्ध व प्रवासी वर्गाला प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत होते. गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या निवेदन व आंदोलनाच्या लढ्याला आज यश मिळाले. ही एकजुटीची ताकद असून, जनता आणि विविध पक्षांच्या पाठबळामुळे हे शक्य झाले आहे.या आंदोलनात लहुजी शक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष लहू खंडागळे, भीमशक्तीचे जिल्हा उपाध्यक्ष अल्ताफ शेख, मर्चंट असोसिएशनचे सदस्य योगेश ओझा, शरीफ शेख, आसिफ मणियार राकेश थोरात, किशोर ओझा असलम आत्तार कैलास बाविस्कर गणेश पालकर गणेश कुवर प्रदीप निकम यांचाही सक्रीय सहभाग होता.तसेच, यावेळी एसटी वाहतूक निरीक्षक अनिल पठारे, वरिष्ठ लिपिक राकेश सोनवणे आदी एसटी विभागाचे अधिकारीही उपस्थित होते.6 ऑक्टोबरपासून सुरू होणारी श्रीरामपूर – मुंबई एसटी बस सेवा प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार असून, या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!