बेलापूर येथील वादग्रस्त बेकरीचे शेड टवले; पोलिसांच्या कडक बंदोबस्तात कारवाई

श्रीरामपूर (प्रतिनिधी) : बेलापूर येथील उर्दू शाळेजवळ गोमांस विक्रीसाठी वापरले जात असलेले वादग्रस्त शेड अखेर बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतीने पोलिस बंदोबस्तात हटवले आहे.


काही दिवसांपूर्वी हिंदुत्ववादी संघटनांनी संबंधित ठिकाणी छापा टाकून गोमांस विक्री होत असल्याचे उघडकीस आणले होते.
या प्रकरणानंतर गावातील विविध हिंदुत्ववादी संघटना, व्यापारी संघटना आणि समाज संघटनांनी शेड हटवण्याची मागणी ग्रामपंचायत, श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशन तसेच तहसीलदार श्रीरामपूर यांच्याकडे केली होती. परवाना नसल्याने बेकरी तात्काळ तीन दिवसांत बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. मागील कारवाई च्या वेळी पोलिसांनी संबंधित इसमाकडुन सुमारे ७५ किलो मांस जप्त केले होते. हे मांस गोमांस आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या मदतीने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.


या कारवाईच्या वेळी मा. जि. प. सदस्य शरद नवले, सरपंच सौ. मीनाताई साळवे, ग्रामविकास अधिकारी निलेश लहारे, पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश जाधव, पोलिस उपनिरीक्षक सुधीर हापसे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भगवंताचे नामस्मरण हीच खरी  संपत्ती-मंहत रामगिरी महाराज;शनी देवगाव येथे गोदातीरी अवतरली प्रतिपंढरी

श्रीरामपूर-हरिनाम व रामनाम घेतल्याने पाप नष्ट होते.मनुष्याला व्यसन लागल्यावर ते सुटत नाही परंतु संताच्या सान्निध्यात आल्यामुळे त्याच्या जिवनात बदल होतो.भगवंताचे नामस्मरण हीच खरी संपत्ती आहे.विस पंचवीस वर्षापूर्वी काही  थोरामोठ्यांचे,संताचे चरित्र पाठ्यपुस्ताकात

कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार-जलसंपदा मंत्री विखे पाटील;नदीजोड प्रकल्पाच्या पहिल्या कार्यालयाचे लोकार्पण

श्रीरामपूर- ‘नदीजोड’च्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार असून पर्जन्यछाया असलेल्या भागांमध्ये जलसिंचनाची मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.नाशिक

साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचे सोने-मंहत रामगिरी महाराज;शनि देवगाव सप्ताहात गोदावरी नदीतीरी लाखो भाविकांची मांदियाळी

श्रीरामपूर-मानवाच्या मन व बुद्धी यांचे शुद्धीकरण करण्यासाठीच आपल्या साधुसंतांनी अखंड हरिनाम सप्ताह सारख्या परंपरा सुरू केल्या.ज्याप्रमाणे परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते,त्याचप्रमाणे साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचेही सोने होते,असे प्रतिपादन महंत रामगिरीजी

लोणी खुर्द येथे घरकुलासाठी ४७ गुंठे जागेचा प्रस्ताव शासनाकडे- मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील; ८ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात

श्रीरामपूर-लोणी खुर्द येथील भीमनगर वसाहतीमधील रहिवाशांना त्यांच्या हक्काचे घरकुल मिळावे, यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शासनाच्या मालकीची ४७ गुंठे जागा निश्चित करून तिचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

Latest News

Trending News