पायी दिंडीच्या वारकऱ्यांना ९०० रेनकोट वाटपाचा उपक्रम | Shrirampur Live

श्रीरामापूरमधील हार्दिक उपक्रमाबद्दल वाचा, जिथे संत तुळशीराम महाराज पडाई दिंडीतील ९०० भाविकांना पंढरपूरच्या यात्रेदरम्यान पावसाळ्यापासून संरक्षण करण्यासाठी रेनकोट देण्यात आले.

श्रीरामपूर (प्रतिनिधी):
पंढरपूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संत तुळशीराम महाराज पायी दिंडी मुठेवाडगाव, कारेगाव व टाकळीभान येथील अनेक भाविक वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत. या दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना पावसाच्या त्रासापासून संरक्षण मिळावे यासाठी मिरजगाव येथे एक स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला.

या उपक्रमांतर्गत सुमारे ९०० भाविकांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम श्रीरामपूर पंचायत समितीचे माजी सभापती दीपक पटारे, पुणे येथील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते अविनाशजी कुलकर्णी, श्रीरामपूर मार्केट कमिटीचे संचालक गिरधर आसने आणि भाजप तालुका सरचिटणीस डॉ. शंकरराव मुठे यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला.

“मानव सेवा हीच ईश्वर सेवा” या विचारातून हे रेनकोट वाटप करण्यात आले असून, पावसाळी हवामानात वारकऱ्यांना चालताना त्रास होऊ नये, हा यामागचा मुख्य हेतू असल्याचे डॉ. मुठे यांनी सांगितले.

या प्रसंगी अनेक दिंड्यांना सदिच्छा भेटी देण्यात आल्या व सर्व भाविकांचे स्वागत सन्मानपूर्वक करण्यात आले.

कार्यक्रमावेळी श्रीराम संघाचे रामेश्वर मुठे, मारुती जासूद, प्रदीप मुठे, जालिंदर मुठे, साईनाथ मुठे, ओम मुठे, वेदांत मुठे आदी उपस्थित होते. या उपक्रमामुळे वारकऱ्यांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

याप्रकारचे सामाजिक उपक्रम वारकरी संप्रदायाला बळ देणारे असून, भाविकांच्या सेवेसाठी समाजातील पुढाकार घेणाऱ्या लोकांचे कौतुक सर्वत्र होत आहे.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News