बेलापूर येथे नवीन पोलीस स्टेशन करा; पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे मागणी

Belapur Police Station request

बेलापूर व परिसरातील वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारीचा वाढता आलेख लक्षात घेता, येथील पोलिस दूरक्षेत्राच्या जागी स्वतंत्र पोलीस स्टेशन सुरु करण्याची मागणी जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे करण्यात आली. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी निवेदन सादर केले आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी)-बेलापूर येथे सध्या पोलिस दूरक्षेत्र असून गावाची लोकसंख्या, विस्तार, दूरक्षेत्राचे कार्यक्षेत्र तसेच हद्दीत वाढत्या गुन्हांची संख्या लक्षात घेता बेलापूर येथे नविन पोलिस स्टेशन कार्यान्वित करावे, अशी मागणी जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांचेकडे करण्यात आली आहे.


पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी नुकतीच श्रीरामपूरला भेट दिली. त्याप्रसंगी बेलापूर, ऐनतपूर, बेलापूर खुर्द, नर्सरी, वळदगाव, उंबरगाव, एकलहेरे, पढेगाव, उक्कलगाव या गावांचा समावेश होऊन बेलापूर बुद्रूक येथे नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती व्हावी. तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात यावा, अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, माजी उपसभापती अभिषेक खंडागळे, पत्रकार देविदास देसाई, अॅड. अरविंद साळवी, महेश कुहे, अभिषेक नवले आ आदी उपस्थित होते. बेलापूर पोलिस दूरक्षेत्र हे सध्या श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनला संलग्न आहे. येथे पोलिस उपनिरीक्षक व कॉन्स्टेबल अशी पदे आहेत. बेलापूर-ऐनतपूर गावाचा विस्तार, दूरक्षेत्राचे कार्यक्षेत्र लक्षात घेता पुरेसे कर्मचारी पोलिस स्टेशन असणे गरजेचे आहे याकडे निवेदनाव्दारे घार्गे यांचे लक्ष वेधण्यात आले.

“पोलीस कर्मचारी व संसाधनांची कमतरता लक्षात घेता, बेलापूरसारख्या वाढत्या गावासाठी स्वतंत्र पोलिस स्टेशनची गरज आहे,” असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Tags: #BelapurNews #PoliceStationDemand #ShrirampurLive

Author Name : ✍️ नितिन शेळके प्रतिनिधी – श्रीरामपूर लाईव्ह

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News