3 हजार भाव द्या,अशोकलाच ऊस देऊ-ऍड.काळे;कमलपूर येथे शेतकरी संघटनेच्या शाखेचे उद्घाटन

श्रीरामपूर-ऊस उत्पादकांचे मागच्या हंगामांचे राहिलेले प्रति टन 800 रुपये देऊन येणाऱ्या गळीत हंगामाचा भाव शेजारच्या कारखान्यांप्रमाणे 3 हजार रुपये द्या.शेतकरी नक्कीच...

श्रीरामपूर-
ऊस उत्पादकांचे मागच्या हंगामांचे राहिलेले प्रति टन 800 रुपये देऊन येणाऱ्या गळीत हंगामाचा भाव शेजारच्या कारखान्यांप्रमाणे 3 हजार रुपये द्या.शेतकरी नक्कीच अशोकला ऊस देतील,असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ऍड. अजित काळे यांनी केले.
कमलपूर येथील शेतकरी संघटनेच्या शाखेचे उद्घाटन ऍड अजित काळे यांच्या हस्ते सम्पन्न झाले.त्यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, तालुकाध्यक्ष युवराज जगताप,संतोष पटारे, शिवाजी पटारे, सुजित बोडखे, मेजर गव्हाणे, डॉ. विकास नवले ,साहेबराव चोरमल, कडूभाऊ पवार ,शरद आसणे , सुनील आसने,अकबरभाई शेख ,गोरख पवार ,संदीप उघडे , अँड.प्रशांत कापसे, अँड.सर्जेराव घोडे, सचिन वेताळ, सुनील असणे, बाबासाहेब असणे ,बाळू असणे चक्रनारायणआदि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

उपस्थित शेतकऱ्यांनी ‘संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे’ अशा घोषणांनी परिसर दणाणून टाकला.
ऍड.अजित काळे पुढे म्हणाले की,कमलपूर मला नवीन नाही.इथे शाखा उघडली जातेय याचा आनंदच आहे.संघटनेच्या कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लागला तर आम्ही तुमचा हिशोब नक्की करू,असा इशाराही त्यांनी दिला.ते पुढे म्हणाले जिल्ह्यात शेजारचे कारखाने उसाला 3000 भाव देतात तुम्ही तो का देत नाही?अशोक कारखाना तितका भाव का देऊ शकत नाही हे तुम्ही एकदा समोर येऊन स्पस्टपणे समजून सांगितले पाहिजे.इतकी वर्षे एकहाती सत्ता तुमच्या ताब्यात दिली.आज 450 कोटींचे कर्ज कारखान्यावर झालेले आहे.आम्ही कधी राजकारणात यायचे ठरवले नव्हते परंतु तुम्ही ती भूमिका संघटनेला घ्यायला लावली.येणाऱ्या अशोक कारखाना निवडणूकीच्या माध्यमातून शेतकरी संघटना आणखी ताकदीने पुढे येणार आहे.40-40 वर्ष आम्ही ऊस अशोकला दिला आता तुम्ही म्हणता बाहेर ऊस देऊ नका नाहीतर आपला कारखाना बंद पडेल.तुम्ही किमान उच्चंकी भाव देणाऱ्यांच्या बरोबरीने भाव जाहीर करा शेतकरी नक्की अशोकलाच ऊस देतील.तुम्ही तुमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी तुम्ही रात्रीतून आपले विचार बदलता आणी राजकिय सेटलमेंट करता.परंतू संघटनेची वैचारिक भूमिका ठाम आहे.शेतकऱ्यांना कोणाच्याही गुलामगिरीतुन बाहेर काढायची ताकद फक्त शेतकरी संघटनेत आहे.येणाऱ्या काळात अशोक कारखाना शेतकरी संघटना 100 टक्के ताब्यात घेवून शेतकऱ्यांना चांगला भाव देईल.शाखेच्या उद्घाटनामुळे आता कमलपूरकरांची जबाबदारी आहे की अशोकच्या निवडणूकित जास्तीत जास्त मतदान जास्त संघटनेच्या उमेदवाराला झाले पाहिजे,असेही ते शेवटी म्हणाले.जिल्हाध्यक्ष अनिल औताडे म्हणाले की, आमचा लढा हा कोणत्याही नेत्याच्या विरोधात नाही.शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष करण्याची भूमिका संघटनेची आहे.ऊस दराच्या प्रश्नावर आमचा संघर्ष सुरूच राहणार आहे.काळे कारखान्याने 3100 भाव दिला.गणेश विनाकपात 3000 भाव देतो.अशोक मात्र 2700 भाव देतो.मागच्या दोन हंगामाच्या राहिलेले 800 रुपये द्या ते जमत नसेल तर सत्ता सोडून खुर्च्या खाली करा,असे आव्हान औताडे यांनी केले.प्रास्तविक पत्रकार नितीन शेळके यांनी केले.तर आभार बाळासाहेब मुरकुटे यांनी मानले.याप्रसंगी कमलपूरचे शाखाध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे,गणेश मुरकुटे,अशोक गोरे, रावसाहेब मुरकुटे,दिगंबर गोरे,भाऊसाहेब गोर्डे,सुभाष तांदळे, रवी मुरकुटे,हरिभाऊ दवंगे,शिवाजी गोरे आदींसह मोठया संख्येने शेतकरी उपस्थित होते.

कमलपूर येथे शेतकरी संघटनेच्या शाखेचे उद्घाटन ऍड. अजित काळे यांच्या हस्ते करण्यात आले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!