आ.चव्हाण संघटनात्मक अनुभव असलेले नेतृत्व; ना.विखे पाटील यांचे गौरवोद्गार चव्हाण यांच्या प्रदेशाध्यक्षपदी निवडीबद्दल सन्मान

श्रीरामपूर (प्रतिनिधी)-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेतील स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली...

pradeshadyaksh

श्रीरामपूर (प्रतिनिधी)-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेतील स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भारतीय जनता पक्ष अधिक मजबुतीने काम करून मोठे यश मिळवेल, असा विश्वास जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.


भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार रवींद्र चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.


आ. रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून संघटनात्मक अनुभव असलेले नेतृत्व प्रदेशाध्यक्ष पदावर विराजमान झाल्याने कार्यकर्ते आणि पदाधिका-यां मध्ये मोठा उत्साह असल्याचे त्यांनी सांगितले.


आ. रविंद्र चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. कल्याण डोंबीवली महानगर पालिका आणि डोबिवली विधानसभा मतदार संघाचे पहिले आमदार म्हणून त्यांनी विजयाची घोडदौड सुरु केली. सलग चार वेळा या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व ते करीत आहेत. सार्वजनिक जीवनात विकास कामांच्या प्रक्रीयेला पुढे जाण्याचा मोठा अनुभव तसेच एक कार्यकर्ता ते प्रदेशाध्यक्ष अशी त्यांची राहीलेली संघटनात्मक वाटचाल सर्वांसाठीच प्रेरणादायी असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.


महायुती सरकारमध्ये विविध मंत्री पदांचा कार्यभार सांभाळताना त्यांनी नागरी हिताचे निर्णय घेतले. यामध्ये प्राधान्याने राज्यातील रस्ते विकासामध्ये त्यांचे योगदान महत्वपूर्ण राहीले. सरकार आणि संघटना यातील योग्य समन्वय साधण्याचा अनुभव आ. रविंद्र चव्हाण यांच्या पाठीशी असल्याने राज्यात भाजपाच्या संघटनात्मक कामाला त्यांचे बहुमोल असे मार्गदर्शन निश्चित उपयुक्त ठरेल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य करीत असलेल्या विकासात्मक वाटचालीला संघटनेच्या माध्यमातून भक्कम असे पाठबळ उभे करून आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीतही विधानसभे प्रमाणेच भारतीय जनता पक्ष प्रथम स्थानावर यश मिळवेल असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!