‘त्यांच्या’ घरावर बुलडोझर फिरवा- त्रिभुवनशौचालयाचा मैला पिण्याच्या पाईपलाईनमध्ये सोडणाऱ्यांविरोधात निदर्शने

श्रीरामपूर(प्रतिनिधी)-पिण्याच्या पाण्याच्या तलावात शौचालयचा मैला सोडणाऱ्या समाजकंटाकावर कडक कारवाई करावी तसेच श्रीरामपूर शहराला शुद्ध पाणी मिळावे पाटात दूषित पाणी सोडणाऱ्या नागरिकांवर...

9 shrirampur nagarparishad

श्रीरामपूर(प्रतिनिधी)-
पिण्याच्या पाण्याच्या तलावात शौचालयचा मैला सोडणाऱ्या समाजकंटाकावर कडक कारवाई करावी तसेच श्रीरामपूर शहराला शुद्ध पाणी मिळावे पाटात दूषित पाणी सोडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करावी तसेच रामभरोसे असलेल्या तलावाला वीस फुटाची संरक्षण भिंत बांधून त्या ठिकाणी सीसी कॅमेरे लावण्यात यावे तसेच तलावाला २४ तास वॉचमनचा पहारा देण्यात यावा या मागणीसाठी १ जुलै रोजी श्रीरामपूर नगर परिषदेवर रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली भव्य निदर्शने करण्यात आली.

त्यावेळी मागण्याचे निवेदन मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांना रिपाईच्या जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये शिवसेनेचे नेते संजय छल्लारे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या हस्ते देण्यात आले.त्यावेळी रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन म्हणाले की शासनाच्या निधीतून नगरपालिकेने लाखो रुपये खर्चून  गोंधवणी या ठिकाणी  श्रीरामपूरकरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे परंतु तेच पाणी सुरक्षित राहिले नाही कारण गेली सात आठ वर्षापासून मिल्लतनगर या ठिकाणी राहणाऱ्या  लोकांकडून शौचालयाचे मैलामिश्रित पाणी पिण्यास मिळाले. हा अत्यंत भयंकर व गंभीर गुन्हा असून माणुसकीला काळीमा फासणारा हा  प्रकार आहे. म्हणून त्या समाजकंटकाच्या घरावर बुलडोझर फिरवा अशी मागणी रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी केली आहे. संजय  छल्लारे म्हणाले की साठवण तलावात जाणाऱ्या पिण्याच्या  पाईपच्या लाईन  वरील अतिक्रमण त्वरित काढण्यात  यावे अन्यथा नगरपरिषदेवर तीव्र आंदोलन छेडू. तसेच राजेंद्र सोनवणे म्हणाले की श्रीरामपूर शहरातील नगरपालिकेच्या पाण्याने आपले देव देवता धुवून मनोभावाने पूजाच्या करतात तेच पाणी जर शौचालयाचा मैला मिश्रित आहे ज्यांनी हे कृत्य केलं त्याला माफी देता कामा नाही.  अभिजीत लिपटे म्हणाले की नगरपालिकेने श्रीरामपूर शहरातील गोरगरिबाच्या टपऱ्या काढून त्यांना देशोधडीला लावले तशी त्वरित वरील अतिक्रमण काढण्यासाठी वापरावी यावेळी भैय्या भिसे सागर कुदळे रमादेवी धीवर मुक्तार शहा रियाज पठाण रुपेश हरकल बाली बेलदार आदींनी मनोगत व्यक्त केले त्यावेळी राम शिंदे लखन वायकर किशोर ठोकळ सुरेंद्र पानपाटील संघराज त्रिभुवन राहुल लुक्कड विजय जाधव सुनील कासार राहुल शहाणे शाहरुख मन्सुरी रवी चव्हाण आप्पासाहेब गाडेकर अनिल इंगळे सिद्धांत गायकवाड रोहित नाईक प्रकाश कोळेकर सुनील दंडवते श्रीराम निकम गोरख शिवदे उज्वला येवलेकर कारभारी त्रिभुवन दीपक माखीजा गणेश पालकर आदी  उपस्थित होते सूत्रसंचालन राजेंद्र सोनवणे यांनी केले आभार अभिजीत लिपटे यांनी मानले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!