विखे पाटलांनी संयमाने हाताळले आंदोलन;मराठा आंदोलकांनीही विखे यांच्यावर मुक्तहस्ते उधळला गुलाल

श्रीरामपूर-नितीन शेळकेमहाराष्ट्राच्या राजकाराणातील एक अत्यंत प्रभावशाली मराठा चेहरा म्हणून मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव अधोरेखित...

श्रीरामपूर-नितीन शेळके
महाराष्ट्राच्या राजकाराणातील एक अत्यंत प्रभावशाली मराठा चेहरा म्हणून मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव अधोरेखित झाले आहे.त्यांच्या निमित्ताने हा मान अहिल्यानगर जिल्ह्याला मिळाल्याने जिल्ह्यात आनंदोत्सव साजरा केला जात आहे.मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षण आंदोलन त्यासाठी मोठे निमित्त ठरले आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाबाबत अवघ्या काही दिवसात त्यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेली जबाबदारी त्यांनी यशस्वी करून दाखवित मराठा समाजाचीही मने जिंकली आहेत.आज मराठा आंदोलकांनी विखे पाटील यांचे मुंबई येथे आभार मानत त्यांच्यावर गुलालाची मुक्त हस्ते उधळण केली.

विखे पाटील यांनी सातत्याने अतिशय संयमाने सर्वाशी संवाद साधत 3 ते 4 दिवस घेतलेल्या मेहनतीचे यश जरांगे पाटील यांचे आंदोलन यशस्वी करण्यात झाले आहे.या निमित्ताने मुंबई मध्ये गणेश उत्सवात निर्माण झालेल्या पेच प्रसंगातुन त्यांनी सरकारलाही लीलया बाहेर काढले आणि मराठा समाजालाही न्याय मिळवून देत आंदोलकांचे समाधान केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपसमितीच्या अध्यक्षपदी मंत्री विखे पाटील यांची नियुक्ती केली होती.समितीच्या सर्व सदस्यांना एकत्रित करून त्यांनी जरांगे पाटील यांच्या प्रत्येक मागणीवर कायदेशीर दृष्टीने अभ्यास करून त्याला कायदेशीर आधार देण्यासाठी त्यांनी बैठकांचा सिलसिला सलग सुरू ठेवला.परिस्थिती जिकरीची आणि संवेदनशील होती तरी त्यांनी त्रागा न करता आंदोलकांशी अतिशय उत्तम समन्वय ठेवला. आधिकारी वर्गाच्या बैठका घेऊन आंदोलकांच्या मागण्यांवर समाधान शोधण्याची तारेवरची कसरत त्यांना करावी लागली.मंत्री विखे पाटील यांच्यातील नेतृत्व गुणांची मराठा आंदोलनाच्या निमिताने पुन्हा एकदा राज्याला प्रचिती आली.त्यामुळेच मनोज जरांगे यांनीही आजच्या मराठा आंदोलनाच्या यशस्वी होण्याचे श्रेय निर्विवादपणे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सर्व आंदोलकांसमक्ष दिले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!