विखे पाटलांनी संयमाने हाताळले आंदोलन;मराठा आंदोलकांनीही विखे यांच्यावर मुक्तहस्ते उधळला गुलाल

श्रीरामपूर-नितीन शेळकेमहाराष्ट्राच्या राजकाराणातील एक अत्यंत प्रभावशाली मराठा चेहरा म्हणून मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव अधोरेखित...

श्रीरामपूर-नितीन शेळके
महाराष्ट्राच्या राजकाराणातील एक अत्यंत प्रभावशाली मराठा चेहरा म्हणून मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव अधोरेखित झाले आहे.त्यांच्या निमित्ताने हा मान अहिल्यानगर जिल्ह्याला मिळाल्याने जिल्ह्यात आनंदोत्सव साजरा केला जात आहे.मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षण आंदोलन त्यासाठी मोठे निमित्त ठरले आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाबाबत अवघ्या काही दिवसात त्यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेली जबाबदारी त्यांनी यशस्वी करून दाखवित मराठा समाजाचीही मने जिंकली आहेत.आज मराठा आंदोलकांनी विखे पाटील यांचे मुंबई येथे आभार मानत त्यांच्यावर गुलालाची मुक्त हस्ते उधळण केली.

विखे पाटील यांनी सातत्याने अतिशय संयमाने सर्वाशी संवाद साधत 3 ते 4 दिवस घेतलेल्या मेहनतीचे यश जरांगे पाटील यांचे आंदोलन यशस्वी करण्यात झाले आहे.या निमित्ताने मुंबई मध्ये गणेश उत्सवात निर्माण झालेल्या पेच प्रसंगातुन त्यांनी सरकारलाही लीलया बाहेर काढले आणि मराठा समाजालाही न्याय मिळवून देत आंदोलकांचे समाधान केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपसमितीच्या अध्यक्षपदी मंत्री विखे पाटील यांची नियुक्ती केली होती.समितीच्या सर्व सदस्यांना एकत्रित करून त्यांनी जरांगे पाटील यांच्या प्रत्येक मागणीवर कायदेशीर दृष्टीने अभ्यास करून त्याला कायदेशीर आधार देण्यासाठी त्यांनी बैठकांचा सिलसिला सलग सुरू ठेवला.परिस्थिती जिकरीची आणि संवेदनशील होती तरी त्यांनी त्रागा न करता आंदोलकांशी अतिशय उत्तम समन्वय ठेवला. आधिकारी वर्गाच्या बैठका घेऊन आंदोलकांच्या मागण्यांवर समाधान शोधण्याची तारेवरची कसरत त्यांना करावी लागली.मंत्री विखे पाटील यांच्यातील नेतृत्व गुणांची मराठा आंदोलनाच्या निमिताने पुन्हा एकदा राज्याला प्रचिती आली.त्यामुळेच मनोज जरांगे यांनीही आजच्या मराठा आंदोलनाच्या यशस्वी होण्याचे श्रेय निर्विवादपणे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सर्व आंदोलकांसमक्ष दिले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!