श्रीरामपूर-परळी रेल्वे मार्गाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर;खासदारकी पणाला लावू-खा.वाकचौरे

श्रीरामपूर-श्रीरामपूर-परळी रेल्वे मार्गापेक्षा दुप्पट तोट्यात असलेल्या रेल्वे मार्गाला सरकारने मंजुरी दिली. त्या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. मात्र गेल्या तीन वर्षापासून...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर-परळी रेल्वे मार्गापेक्षा दुप्पट तोट्यात असलेल्या रेल्वे मार्गाला सरकारने मंजुरी दिली. त्या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. मात्र गेल्या तीन वर्षापासून या रेल्वे मार्गाला मंजुरीपासून वंचित ठेवून या भागावर अन्यायचं केला आहे. 104 वर्षापासून प्रलंबित असलेल्या श्रीरामपूर-परळी रेल्वे मार्गाला मंजुरी देऊन या रेल्वे मार्गाचे काम तातडीने सुरू करण्याची आग्रही मागणी शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी संसदेत तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून केली.
खा. वाकचौरे यांनी संसदेत तारांकित प्रश्न उपस्थित करताना सांगितले की, 104 वर्षापासून प्रलंबित असलेल्या श्रीरामपूर परळी रेल्वे मार्गाला ब्रिटिशांनी मंजुरी देऊन भूमी अधिग्रहण करत माती भरावाचे काम पूर्ण झाले आहे. तसेच सर्वेक्षण पूर्ण होऊन सर्वेक्षण अहवाल जून 2022 मध्ये मंजुरीसाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. हे सर्व असूनही केवळ आरओआर चे कारण देत गेल्या तीन वर्षापासून या रेल्वे मार्गाला मंजुरी पासून वंचित ठेवणे अन्यायकारक असल्याचे वाकचौरे यांनी सांगितले तसेच या रेल्वे मार्गापेक्षा दुप्पट तोट्यात असलेल्या रेल्वे मार्गाला सरकारने मंजुरी देत अशा रेल्वे मार्गाचे काम सुरू आहेत याकडे खासदार वाकचौरे यांनी लक्ष वेधले श्रीरामपूर परळी रेल्वे मार्गासाठी राज्य शासन हे 50 टक्के खर्च करण्यास तयार असल्याचेही केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या लक्षात आणून दिले आहे या सर्व गोष्टी पूरक असूनही केवळ केंद्राच्या मंजुरीमुळे हा रेल्वे मार्ग प्रलंबित असल्याचे वाकचौरे यांनी सांगितले तसेच या रेल्वे मार्गामुळे जागतिक तीर्थक्षेत्र असलेले शिर्डी व तिरुपती बालाजी या तीर्थक्षेत्रातील अंतर 550 किलोमीटरने कमी होणार आहे  तसेच या रेल्वे मार्गावर दहा ते पंधरा साखर कारखाने असल्याने रेल्वेला मालवाहतुकीतून जास्तीचे उत्पन्न मिळणार आहे या रेल्वे मार्गाला प्रलंबित ठेवल्यामुळे या मार्गावरील तालुके दोन जिल्हे यांचा विकास खुंटलेला असल्याचेही त्यांनी रेल्वे मंत्र्यांच्या लक्षात आणून दिले आहे या सर्व बाबींचा विचार करता केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी श्रीरामपूर परळी रेल्वे मार्गाबाबत सकारात्मकता दाखवली आहे या मार्गाच्या निवेदनाच्या प्रती रेल्वे राज्यमंत्री वी सोमन्ना व रवणीत सिंह यांना देण्यात आले आहे

माझी खासदारकी पणाला लावील
श्रीरामपूर-परळी रेल्वे मार्गावर कशाप्रकारे अन्याय केला जात आहे हे रेल्वेमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले आहे. या रेल्वे मार्गाच्या मंजुरीसाठी आणि हा रेल्वे मार्ग पूर्णतःवास लावण्यासाठी मी माझी खासदारकी पणाला लावील-खासदार भाऊसाहेब वाकचौरे

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!