सैनिकांसाठी पाठविल्या ११ हजार राख्या;श्रीरामपूरच्या सौ.पूजा चव्हाण यांचा उपक्रम

श्रीरामपूर-
देशाच्या सुरक्षेसाठी सीमेवर सैनिक आपले कर्तव्य बजावत असून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रीरामपूर येथील सौ.पूजा हर्षद चव्हाण यांनी ११ हजार जवानांना राख्या पाठविल्या आहेत.गेल्या काही वर्षांपासून पूजा चव्हाण या सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व इतर उपक्रम त्यांच्या मार्फत राबविले जातात. अहिल्या प्रतिष्ठानच्या अध्यक्षा व भाजप उत्तर अहिल्यानगर जिल्हा सरचिटणीस असलेल्या पूजा चव्हाण जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे व माजी खा.सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या १२ वर्षांपासून भारतीय सैन्य दलांना राख्या पाठवितात.यंदाही मेघालय,आसाम,जम्मू,लडाख पंजाब,बेंगलोर ,अंबाला आदी  ठिकाणी जवानांना पोस्टाद्वारे ११ हजार राख्या पूजा चव्हाण यांनी पाठविल्या आहेत.श्रीरामपूर येथे माजी खा.डॉ.सुजय विखे यांच्या हस्ते जवानांना राख्या पाठविण्यात आल्या. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर,मा. सभापती दीपक पटारे,शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड,गिरीधर आसने,अभिषेक खंडागळे,भाऊसाहेब बांदरे ,मंजुषा ढोकचौळे,पुष्पलता हरदास यांसह अनेक पदाधिकारी आणि महिला उपस्थित होत्या.रक्षाबंधन हे आता बहीण-भावापुरते मर्यादित न राहता, रक्षणकर्त्या प्रत्येक घटकांशी बांधील झालेले आहे. निसर्गाशीही रक्षाबंधनाचे नाते जोडले गेले आहे. अशा वेळी जीव धोक्यात घालून भारतीय सीमेवर आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांपर्यंत राख्या पोहोचविण्याचे पूजा चव्हाण यांचे कार्य निश्चित सैनिकांचे मनोधैर्य उंचाविणारे असल्याचे डॉ.सुजय विखे म्हणाले.राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

पूजा चव्हाण यांनी माजी खा.डॉ.सुजय विखे यांच्या हस्ते सैनिकांसाठी राख्या पाठविल्या आहेत.यावेळी मा. सभापती दीपक पटारे,शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड,गिरीधर आसने,अभिषेक खंडागळे,भाऊसाहेब बांदरे आदी.

Leave a Comment

संबंधित बातम्या

पोरा बाळांच्या टीकेवर नका बोलू,पण जनतेचे तर प्रश्न सोडवा-मा.खा.डॉ.सुजय विखे यांचा नाव न घेता थोरातांना खोचक टोला

श्रीरामपूर-आम्ही पोरं-बाळं यांनी केलेल्या टिकेवर उत्तर देत नाही, असे ते म्हणतात.परंतु आम्हीही सूडबुद्धीने राजकारण करत नाही.मग आमच्यावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा जनतेचे प्रश्न सोडवण्यास वेळ द्या,असा खोचक टोला मा.खा. सुजय विखे यांनी

पुणे- नागपूर वंदे भारत एक्सप्रेसला बेलापूर स्टेशनला थांबा द्या;आ.हेमंत ओगले यांची केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी

श्रीरामपूर-नव्याने चालू झालेल्या पुणे - नागपूर वंदे भारत एक्सप्रेसला बेलापूर रेल्वे स्थानकावर थांबा द्या अशी मागणी आमदार हेमंत ओगले यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.सदर पत्रात नमूद

श्रीरामपूरातील कृषी सेवा केंद्रांतून बनावट औषधांची विक्री?;’कुंपणच शेत खात’ असल्याचा गंभीर प्रकार

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्व भागातील नामांकित कृषी सेवा केंद्रातून शेतकऱ्यांना मोठंमोठ्या कंपन्यांच्या नावाने पिकांसाठी लागणारी बनावट पोषक,संप्रेरके व कीटकनाशके विक्री करण्याचा संतापजनक प्रकार सुरू आहे.अनेक दिवसांपासून सुरू असलेला हा गंभीर प्रकार

सैनिकांसाठी पाठविल्या ११ हजार राख्या;श्रीरामपूरच्या सौ.पूजा चव्हाण यांचा उपक्रम

श्रीरामपूर-देशाच्या सुरक्षेसाठी सीमेवर सैनिक आपले कर्तव्य बजावत असून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रीरामपूर येथील सौ.पूजा हर्षद चव्हाण यांनी ११ हजार जवानांना राख्या पाठविल्या आहेत.गेल्या काही वर्षांपासून पूजा चव्हाण या सामाजिक

दिव्यांग व्यक्तीला व्यवसाय व नोकरी करिता बॅटरीवरील सायकल प्रदान;मा.खा.डॉ.सुजय विखे यांचे विशेष सहकार्य

श्रीरामपूर-डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र अहिल्यानगर यांच्यामार्फत आणि माजी खासदार डॉ.सुजय विखे यांच्या विशेष सहकार्यामुळे आज श्रीरामपूर येथील कु.दर्शना पापडीवाल या दिव्यांग

सिद्धेश्वर मंदिरातून चोरीस गेलेल्या भजनी मंडळाचे २८ टाळ परत;नेवासा पोलीसांनी विधिवत केले परत

श्रीरामपूर-नेवासा तालुक्यातील रांजणगाव देवीचे येथील सिद्धेश्वर मंदिरातून चोरीस गेलेल्या भजनी मंडळाचे २८ टाळ संबंधितांना नेवासा पोलीसांनी मंगळवारी परत केले.रांजणगाव देवीचे येथील सिद्धेश्वर भजनी मंडळाचे २२ हजार ४०० रुपये किमतीचे पितळी

Latest News

Trending News