प्रवरा कालव्यांना आवर्तन सोडण्याचे निर्देश;जलसंपदा मंत्री विखे पाटील यांचा शेतकऱ्यांना दिलासा

श्रीरामपूर-उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन प्रवरा डाव्या व उजव्या कालव्यातून सिंचन तसेच बिगर सिंचनाचे दुसरे एकत्रित आवर्तन तातडीने सोडण्यात...

श्रीरामपूर-
उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन प्रवरा डाव्या व उजव्या कालव्यातून सिंचन तसेच बिगर सिंचनाचे दुसरे एकत्रित आवर्तन तातडीने सोडण्यात येणार आहे. नदीकाठच्या गावांना मोठा दिलासा देणारे हे आवर्तन सोडण्याचे निर्देश जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत.सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने बहुतांश गावांतील पाण्याचे स्रोत आटले आहेत. शेतीसह पाणीपुरवठा योजनांना पाणी उपलब्ध होत नसल्याने नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासह जनावरांसाठी पाणी मिळावे, अशी शेतकरी व नदीकाठच्या गावांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत होती.प्रवरा नगर येथे आयोजित जनता दरबाराच्या माध्यमातून आमदार अमोल खताळ यांच्यासह शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने या प्रश्नावर तातडीने निर्णय घेण्याची विनंती केली होती.या विनंतीची दखल घेत धरणातील पाण्याच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला व त्यानंतर हे एकत्रित आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला. सुरू होणाऱ्या या आवर्तनातून पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!