विस्थापित व्यापाऱ्यांचे त्वरित पुनर्वसन करा;अन्यथा उग्र आंदोलन-त्रिभुवन यांचा इशारा

श्रीरामपूर-विस्थापित व्यापाऱ्यांचे पुनर्वसन करावे या मागणीसाठी श्रीरामपूर नगर परिषदेसमोर श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली भव्य निदर्शने करण्यात...

श्रीरामपूर-
विस्थापित व्यापाऱ्यांचे पुनर्वसन करावे या मागणीसाठी श्रीरामपूर नगर परिषदेसमोर श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली भव्य निदर्शने करण्यात येऊन मागणीचे निवेदन नगराध्यक्ष करण ससाने यांना देण्यात आले.
त्यावेळी त्रिभुवन म्हणाले की श्रीरामपूर नगर परिषदेने 27 जानेवारी 2025 रोजी अतिक्रमणाच्या नावाखाली नेवासा रोड, बेलापूर रोड, शहर पोलीस स्टेशन समोरील गोंदवणी रोड परिसरातील छोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांची दुकाने हटवून त्यांच्यावर मोठा अन्याय केला आहे.
या कारवाईमुळे अनेक व्यापारी अक्षरशः उघड्यावर आले असून त्यांची उपजीविका बंद पडली आहे. विस्थापित व्यापारी कर्जाच्या खाईत लोटला गेला असून रोजची भाकर कमावणेही कठीण झाले आहे. मुलांचे शिक्षण, घरातील वृद्ध आई-वडिलांचे उपचार, तसेच बँका व फायनान्स कंपन्यांचे कर्ज फेडणे अशक्य झाले असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान काँग्रेस पक्षाचे नेते व नूतन नगराध्यक्ष करण ससाणे यांनी सत्तेत आल्यानंतर विस्थापित व्यापाऱ्यांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले होते. आता काँग्रेस पक्षाची सत्ता आली असून दिलेला शब्द पाळून विस्थापित व्यापाऱ्यांचे त्वरित पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी समितीने केली आहे. नगराध्यक्ष करण ससाने म्हणाले की विस्थापित व्यापाऱ्यांना लवकरात लवकर न्याय देऊ
विस्थापित व्यापाऱ्यांची गाडी पुन्हा रुळावर यावी यासाठी श्रीरामपूर नगर परिषदेने प्रत्येक व्यापाऱ्याला किमान पाच फूट जागा तातडीने द्यावी व तसा ठराव निवडून आलेले नगराध्यक्ष व नगरसेवकांनी मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाची दखल घेऊन न्याय दिला गेला नाही, तर श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा गंभीर इशाराही सुभाष दादा त्रिभुवन यांनी दिला आहे. त्यावेळी रवी चव्हाण शाहरुख मन्सुरी सुनील दंडवते आसिफ मणियार फयाज पठाण कैलास बाविस्कर जावेद अत्तार श्रीराम निकुंभ  सुमन थोरात कल्पना नरोडे अस्लम शेख दादाभाऊ कोरडे गुलाब गायकवाड शाहिद बागवान बापू सोनवणे नंदा परदेशी मुरलीधर पालवे रवींद्र कोरडे,  सतीश चव्हाण नामदेव पवार विलास चव्हाण राजेंद्र पवार जावेद सय्यद  गोरख बिडवे अशोक जोरवेकर अक्षय गवळी  प्रशांत सूर्यवंशी अन्वरअली जावेद सय्यद भरत नारंग जयमाला उंडे शांताराम बकरे सुरेश चौधरी रंगनाथ उदावंत शरीफ शेख गणेश पालकर अदनान मलिक प्रदीप निकुंभ बेबीताई पालकर सूर्यकांत बावस्कर किशोर राजा मुनीर शेख आधी उपस्थित होते

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!