श्रीरामपूर-
महाराष्ट्र शासनाची महत्वकांक्षी योजना मुख्यमंत्री बळीराजा शेत,शिव, पाणंद, रस्ता योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी असे निवेदन तहसीलदार मिलिंद वाघ यांना देण्यात आले.सदर योजनेत जमीन महसूल अधिनियम 143 व 5/2 नुसार रस्ता पीडित शेतकऱ्यांना शेत शिव पाणंद रस्ते शासनामार्फत खुले करून देण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील शेत रस्ता पीडित शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय श्रीरामपूर येथे आपले लेखी तक्रार अर्ज दाखल करून त्याची पोहोच घ्यावी, सदर योजनेत शासनामार्फत रस्ते खुले करून देण्यात येणार आहेत,असेही निवेदनात म्हटले आहे.
मुख्यमंत्री बळीराजा शेत शिव पाणंद रस्ता श्रीरामपूर तालुका समितीचे पदसिद्ध अध्यक्ष आ. हेमंत ओगले यांनाही सदर योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत निवेदन देण्यात येणार आहे. सदर समितीची मासिक बैठक बाबतची तारीख स्थानिक वर्तमानपत्रात व मीडियात प्रसिद्ध केल्यास जास्तीत जास्त रस्ता पीडित शेतकऱ्यांना या योजनेची माहिती होऊन त्याचा लाभ घेता येईल. शेतकरी संघटने कडून या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणेसाठी व या योजनेचा लाभ शेवटच्या शेतकऱ्याला मिळेपर्यंत अखंड पाठपुरावा करण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील शेत शिव पाणंद रस्ता पीडित शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
याप्रसंगी शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाअध्यक्ष निलेश शेडगे ,उपाध्यक्ष नवनाथ दिघे ,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुनीताताई वानखेडे, आशा शिंदे ,तालुकाअध्यक्ष प्रकाश जाधव ,मधुकर काकड,श्रीराम त्रिवेदी ,अशोक आव्हाड,अंबादास गमे,राजेंद्र चोरमल, भास्कर गायधने,राजेंद्र म्हैस,पावलस बार्से ,अंबादास चोरमल,अशोक बनकर,आदींसह तालुक्यातील शेत रस्ता पीडित शेतकरी उपस्थित होते.
