बेलापूर ते लासूर स्टेशन हा नवीन रेल्वेमार्ग करा;स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

श्रीरामपूर-बेलापूर ते लासूर स्टेशन हा नवीन रेल्वेमार्ग तयार करून छत्रपती संभाजीनगरला अहिल्यानगरमार्गे पुण्याला जोडण्यात यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने...

श्रीरामपूर-
बेलापूर ते लासूर स्टेशन हा नवीन रेल्वेमार्ग तयार करून छत्रपती संभाजीनगरला अहिल्यानगरमार्गे पुण्याला जोडण्यात यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
बेलापूर येथील रेल्वे अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रेल्वे विभागाने नाशिक पुणे-अहिल्यानगर शिर्डी मार्गे रेल्वेमार्ग लोकसभा अधिवेशनात घोषित केला. हा मार्ग अतिशय योग्य असून चाकण ते शिरुर हा संपूर्ण औद्योगिक पट्टा यात जोडला जाणार आहे. या मार्गामध्ये छत्रपती संभाजीनगर मनमाड रेल्वेमार्गावरील एक व्यापारी पेठ असलेल्या लासूर स्टेशन ते बेलापूर हा साधारण ५० किलोमीटरचा नवीन रेल्वेमार्ग सुरु केला. तर महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील महत्वाचे औद्योगिक शहर व आंतरराष्ट्रीय किर्तीचे पर्यटन केंद्र असलेले छत्रपती संभाजीनगर, शहर पुणे तसेच कुंभमेळ्याचे तीर्थक्षेत्र नाशिक ही तिन्ही शहरे एकमेकांना रेल्वेने जोडली जातील.
हा बेलापूर स्टेशन (श्रीरामपूर) ते लासूर स्टेशन लोहमार्ग साधारण ५० किलोमीटरचा असून पैकी ५ किलोमीटर पर्यंत ब्रिटिश कालीन साखर कारखाना बेलापूर शुगर कंपनी पर्यंत रेल्वेमार्ग अस्तित्वात आहे. त्याची फक्त डागडुजी करण्याची करण्याची गरज आहे. या ५ किमी लोहमार्गाचे भूमी अधिग्रहण ही झालेले असून हा रेल्वे मार्ग आपण केल्यास या परिसरातील विकासाला मोठ्याप्रमाणावर चालना मिळेल म्हणून या नगर शिर्डी नाशिक लोहमार्ग करताना बेलापूर स्टेशन ते लासूरस्टेशन या विस्तारित मार्गाची उभारणी करावी.

बेलापूर स्टेशन म्हणजेच श्रीरामपूर शहर हा अहिल्यानगर जिल्ह्याचे विभाजन झाल्यानंतरचे नवीन जिल्हा मुख्यालय असणार आहे. तसेच बेलापूर रेल्वेस्टेशनकडे मोठी जागा ब्रिटिशांनी अधिग्रहित केलेली आहे. त्यामुळे नवीन भूमी अधिग्रहण करण्याची गरज नाही. तसेच चांदेगाव-नागमठाण येथे गोदावरी नदीचे पात्र खडकाळ असल्याने तेथे रेल्वे पुलासाठी योग्य जागाही उपलब्ध आहे. असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुरेश ताके, जितेंद्र भोसले, संतोष जाधव, भरत रामकृष्ण आसने, दत्तात्रय लिप्टे, कॉ. गोविंदराव वाबळे, संदीप गवारे दिलीप गलांडे, किरण ताके, अॅड. प्रमोद बिहाणी, निखिल राजेंद्र, प्रविण चव्हाण, पंकज चव्हाण, अर्जुन साबणे, गणेश ठोंबरे, अनिल रोकडे, अजय गाडेकर, संजय भनगडे, रामदास वाकीर, सुभाष गायकवाड, जयेश निकम आदींच्या सह्या आहेत.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!