बेलापूर ते लासूर स्टेशन हा नवीन रेल्वेमार्ग करा;स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

श्रीरामपूर-बेलापूर ते लासूर स्टेशन हा नवीन रेल्वेमार्ग तयार करून छत्रपती संभाजीनगरला अहिल्यानगरमार्गे पुण्याला जोडण्यात यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने...

श्रीरामपूर-
बेलापूर ते लासूर स्टेशन हा नवीन रेल्वेमार्ग तयार करून छत्रपती संभाजीनगरला अहिल्यानगरमार्गे पुण्याला जोडण्यात यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
बेलापूर येथील रेल्वे अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रेल्वे विभागाने नाशिक पुणे-अहिल्यानगर शिर्डी मार्गे रेल्वेमार्ग लोकसभा अधिवेशनात घोषित केला. हा मार्ग अतिशय योग्य असून चाकण ते शिरुर हा संपूर्ण औद्योगिक पट्टा यात जोडला जाणार आहे. या मार्गामध्ये छत्रपती संभाजीनगर मनमाड रेल्वेमार्गावरील एक व्यापारी पेठ असलेल्या लासूर स्टेशन ते बेलापूर हा साधारण ५० किलोमीटरचा नवीन रेल्वेमार्ग सुरु केला. तर महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील महत्वाचे औद्योगिक शहर व आंतरराष्ट्रीय किर्तीचे पर्यटन केंद्र असलेले छत्रपती संभाजीनगर, शहर पुणे तसेच कुंभमेळ्याचे तीर्थक्षेत्र नाशिक ही तिन्ही शहरे एकमेकांना रेल्वेने जोडली जातील.
हा बेलापूर स्टेशन (श्रीरामपूर) ते लासूर स्टेशन लोहमार्ग साधारण ५० किलोमीटरचा असून पैकी ५ किलोमीटर पर्यंत ब्रिटिश कालीन साखर कारखाना बेलापूर शुगर कंपनी पर्यंत रेल्वेमार्ग अस्तित्वात आहे. त्याची फक्त डागडुजी करण्याची करण्याची गरज आहे. या ५ किमी लोहमार्गाचे भूमी अधिग्रहण ही झालेले असून हा रेल्वे मार्ग आपण केल्यास या परिसरातील विकासाला मोठ्याप्रमाणावर चालना मिळेल म्हणून या नगर शिर्डी नाशिक लोहमार्ग करताना बेलापूर स्टेशन ते लासूरस्टेशन या विस्तारित मार्गाची उभारणी करावी.

बेलापूर स्टेशन म्हणजेच श्रीरामपूर शहर हा अहिल्यानगर जिल्ह्याचे विभाजन झाल्यानंतरचे नवीन जिल्हा मुख्यालय असणार आहे. तसेच बेलापूर रेल्वेस्टेशनकडे मोठी जागा ब्रिटिशांनी अधिग्रहित केलेली आहे. त्यामुळे नवीन भूमी अधिग्रहण करण्याची गरज नाही. तसेच चांदेगाव-नागमठाण येथे गोदावरी नदीचे पात्र खडकाळ असल्याने तेथे रेल्वे पुलासाठी योग्य जागाही उपलब्ध आहे. असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुरेश ताके, जितेंद्र भोसले, संतोष जाधव, भरत रामकृष्ण आसने, दत्तात्रय लिप्टे, कॉ. गोविंदराव वाबळे, संदीप गवारे दिलीप गलांडे, किरण ताके, अॅड. प्रमोद बिहाणी, निखिल राजेंद्र, प्रविण चव्हाण, पंकज चव्हाण, अर्जुन साबणे, गणेश ठोंबरे, अनिल रोकडे, अजय गाडेकर, संजय भनगडे, रामदास वाकीर, सुभाष गायकवाड, जयेश निकम आदींच्या सह्या आहेत.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!