कर्मचाऱ्यांच्या प्रेमाने व निष्ठेने भारावुन गेलो-म्हस्के;श्रीरामपुर जिल्हा दुध संघ कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा

श्रीरामपूर-श्रीरामपुर जिल्हा दुध संघाच्या उभारणीत कर्मचारी व अधिकारी यांचा मोलाचा सहभाग राहीलेला आहे. कामकाज करताना कोणावरही अन्याय केला नाही. दुध धंदा...

श्रीरामपूर-
श्रीरामपुर जिल्हा दुध संघाच्या उभारणीत कर्मचारी व अधिकारी यांचा मोलाचा सहभाग राहीलेला आहे. कामकाज करताना कोणावरही अन्याय केला नाही. दुध धंदा वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. कर्मचाऱ्यांना कुटुंबाचा घटक मानुन अनेकांचा सुख – दुःखात सहभागी होता आहे. पंचवीस वर्षापुर्वी दुरावलेल्या कर्मचाऱ्यांची आजच्या स्नेहमेळाव्याला लक्षणीय उपस्थिती पाहुन मन भारावुन गेले आहे,असे प्रतिपादन दुध संघाचे माजी चेअरमन रावसाहेब म्हस्के यांनी दुध कामगार मेळाव्याच्या स्नेहमेळाव्यात प्रमुख मार्गदर्शन करताना केले. अध्यक्षस्थानी ई.पी.एस.९५ राष्ट्रीय संघर्ष समितीचे कार्यकारी अध्यक्ष सुभाष पोखरकर होते.
दुग्धयोगी रावसाहेब म्हस्के यांचा सहस्ञचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त अभिष्टचिंतन व कार्मचारी पेन्शन वाढीच्या चळवळीचे मार्गदर्शन होण्यासाठी श्रीरामपुर जिल्हा दुध संघाच्या २५ वर्षापुर्वी विस्थापित झालेल्या कर्मचाऱ्यांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन नुकतेच संघाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात नुकतेच करण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात कामगारांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना सत्कारमुर्ती रावसाहेब म्हस्के म्हणाले कि, १९७५ साली सुरु झालेला दुध संघ वाढीसाठी कामगारांचे मोठे योगदान आहे. त्यासाठी कामगारांनी दिवस राञ कष्ट केलेले आहेत. कामकाज करताना दुध संघ वाढला पाहीजे, त्यासाठी दुध व्यवसाय वाढवण्यासाठी मोठे प्रयत्न केले. स्व. अण्णासाहेब शिंदे यांची धवलक्रांतीची प्रेरणा घेवुन संघाच्या चार तालुक्याच्या कार्यक्षेञात दुग्ध व्यवसाय वाढवला. त्यामुळेच संघाची राज्यात नव्हे तर देशात ओळख निर्माण झाली. राजकारण करताना अनेक प्रलोभन आली माञ नेतृत्वाशी आजपर्यंत गद्दारी केली नाही. नेतृत्वाशी एकनिष्ठ राहील्याने अनेक पदं मिळाली त्याचा वापर जनहीतासाठीच केला. कधीही कुणावर आन्याय केला नाही त्यामुळे प्रेम करणारा मोठा वर्ग आजही सोबतीला आहे. गेली २५ वर्षे कामगार दुरावला आसला तरी आजच्या माझ्या सत्कारासाठी कामगारांची उपस्थिती लक्षणीय आसुन कामगारांच्या या प्रेमाने भारावुन गेलो आहे. यावेळी म्हस्के यांना काही क्षण अश्रु अनावर झाल्याने काहीवेळ सभागृहात निशब्द शांतता पसरली होती.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष पोखरकर यांनी कामगारांनी मिळणारी तुटपुंजी पेन्शन वाढुन मिळावी यासाठी सरकार दरबारी प्रयत्न सुरु आसुन किमान ७ हजार ५०० व महागाई भत्ता मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा हसुरु असुन लवकरच या मागणीचा सरकारला विचार करावा लागेल असे सांगितले. यावेळी रीपाईचे बाळासाहेब गायकवाड,  गोविंद जगताप, शाम राठोड, शिवाजी भोसले, संजय ईनामके, दत्तु हुल्लाळे, आन्वरभाई शेख यांनी मनोगत व्यक्त करताना श्रीरामपुर जिल्हा दुध संघ पुन्हा नव्या दमाने संकलन सुरु करण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी आपेक्षा व्यक्त केल्याने उपस्थित कामगारांनी त्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. अनेक वर्षे एकदिलाने काम केलेल्या बहुतांश कर्मचाऱ्यांची तब्बल २५ वर्षानंतर गाठीभेटी झाल्याने एकमेकांची खालीखुशाली जाणुन घेण्यात मग्न झाले होते. अखेर स्नेहभोजनाने या स्नेहमेळाव्याची सांगता झाली. यावेळी कार्यक्रमाचे सुञसंचलन दत्ताञय निर्मळ यांनी केले तर शेवटी आभार शाम दळे यांनी मानले. ह.भ.प. म्हस्के महाराज यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!